शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

जंगलालगतच्या पिकांचे संरक्षण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:50 IST

गावालगतच्या वनक्षेत्रात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष होतो. शेतपिकाचे नुकसान व मानवी जीवितहानीच्या घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजना गडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामापासून अंमलात आणण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोखंडी जाळीचे कुंपण योजना कार्यान्वित : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : गावालगतच्या वनक्षेत्रात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष होतो. शेतपिकाचे नुकसान व मानवी जीवितहानीच्या घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजना गडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामापासून अंमलात आणण्यात येणार आहे.याबाबत राज्याच्या महसूल व वनविभागाने २१ मार्च २०१८ रोजी नवा शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयान्वये आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलालगत शेत जमीन असलेल्या शेतकºयांना ९० टक्के अनुदानावर लोखंडी जाळी कुंपणासाठी मिळणार आहे. त्यादृष्टीने वन विभागाने या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही सुरू केली आहे.वनालगतच्या गावातील लोक जळाऊ लाकूड, शेती, घरगुती कामासाठी लागणार लहान लाकूड, जनावरांचे वैरण, रोजगार तसेच दैनंदिन गरजांसाठी वनावर अवलंबून आहेत. या निर्भरतेमुळे वनांचा दर्जा दिवसागणिक खालावत आहे. जंगलालगतच्या गावामध्ये मानव-वन्यप्राणी संघर्ष होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना कार्यान्वित केली आहे. सदर योजनेंतर्गत शेतकºयांना लोखंडी जाळीचे कुंपण उभारता येणार आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांपासून शेतजमिनीतील धान व इतर पिकांचे या जाळीच्या कुंपणामुळे संरक्षण होणार आहे.आरमोरी वन परिक्षेत्रासह जिल्ह्याच्या अनेक भागात जंगलालगतच्या शेतात दरवर्षी रानडुकर व इतर वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात धुडगुस असतो. शेकडो हेक्टरवरील धानपीक रानडुकर नासधूस करतात. त्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळते. रानडुकर व इतर वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यानंतरही शासन व प्रशासनाकडून संबंधित नुकसानग्रस्त शेतकºयाला नुकसान भरपाई मिळत नाही.आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे नुकसान झाल्याच्या तक्रारी वन विभागासह महसूल विभागाकडे अनेकदा केल्या. मात्र शेतकºयांना मदत मिळाली नाही.झुडपी जंगलावरील भार कमी होणारजंगलालगतच्या गावातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन कुंपण योजना यावर्षी प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे झुडपी व मोठ्या जंगलावरील शेतकºयांचा भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या झुडपी जंगलात तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठी आहे. शेतजमिनीतील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी अनेक शेतकरी झुडपी जंगलातील गराडीचे मोठमोठी झाडे तोडतात. गराडी झाडाचा जंगल बराच नष्ट झाला आहे. शिवाय लहान रोपटेही तोडण्यात आली आहे. शेतकºयांना ९० टक्के अनुदानावर लोखंडी जाळी कुंपणासाठी मिळणार असल्याने जंगलाचे सरंक्षण होणार आहे.ग्रामीण भागात गावकरी जळाऊ लाकूड, घरगुती तसेच शेतीकरिता जंगलतोड करून वनाची मोठी हानी करतात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. वृक्षतोडीमुळे वन्यजीव व जंगल संकटात सापडले आहेत. त्यामुळे आता वनावर अवलंबून असणारी निर्भरता कमी करून शेतकºयांनी शेत कुंपणासाठी आवश्यक त्या वनस्पतीचा वापर करावा.- व्ही. एम. गोडबोले,उपवनसंरक्षक, वन विभाग वडसा