शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

उष्माघातापासून स्वत:चा बचाव करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 5:00 AM

मानवी शरीराचे तापमान १०६ अंश फॅरेनहाईट किंवा ४१ सेल्सिअस अंश इतके वाढते तेव्हा त्याला उष्माघात असे म्हणतात. उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार आहे आणि वैद्यकिय आणिबाणी मानले जाते. उष्माघात हा प्रामुख्याने ५० वर्ष वयोगटातील तसेच तरूण वयोगटातील व्यक्तींनादेखील होऊ शकतो. मानवी शरीराचे तापमान साधारणत: ३७ अंश सेल्सिअस किंवा ९८.६ अंश फॅरेनहाईट असते.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचे आवाहन : गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४२ अंशावर, दुपारी सर्वच मार्गावर शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याचे तापमान ४२ सेल्सिअस अंशावर गेले असल्याने उष्माघात टाळण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी केले आहे.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीराचे तापमान संतुलीत ठेवावे. मानवी शरीराचे तापमान १०६ अंश फॅरेनहाईट किंवा ४१ सेल्सिअस अंश इतके वाढते तेव्हा त्याला उष्माघात असे म्हणतात. उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार आहे आणि वैद्यकिय आणिबाणी मानले जाते. उष्माघात हा प्रामुख्याने ५० वर्ष वयोगटातील तसेच तरूण वयोगटातील व्यक्तींनादेखील होऊ शकतो. मानवी शरीराचे तापमान साधारणत: ३७ अंश सेल्सिअस किंवा ९८.६ अंश फॅरेनहाईट असते. मानवी शरीराच्या तापमान समतोल राखण्याची क्रिया संपुष्टात आल्यानंतर बेशुध्दावस्था येते. प्रसंगी रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. तिव्र तापमानामध्ये शरीराचे तापमान वाढते. डोकेदुखी, चक्कर येणे, कमजोरपणा वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड वाढणे, गोंधळल्यासारखे वाटणे, खुप तहाण लागणे, उष्णता असूनही घाम कमी येणे, उलट्या होणे आदी उष्माघाताची लक्षणे आहेत.बाह्य उष्माघात व परंपरांगत उष्माघात असे उष्माघाताचे प्रकार आहेत. बाह्य उष्माघात हा खेळाडू, सैनिक, शेतात व उन्हात काम करणारे मजुर, दुचाकी प्रवास करणाऱ्यांना होऊ शकतो. तर वयोवृध्द, लठ्ठपणा, मधुमेह असणाऱ्यांना परंपरांगत उष्माघात होऊ शकतो, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रूडे यांनी सांगितले.उष्माघातात अशी घ्या काळजीउष्माघाताचा रुग्ण आढळल्यानंतर रुग्णास लगेच रुग्णालयात दाखल करावे. उष्माघाताच्या रुग्णाला सर्वप्रथम उष्णतेच्या ठिकाणापासून थंड ठिकाणी किंवा सावलीच्या जागेत हलवावे. रुग्णाचे डोके व पाठीचा भाग समांतरपेक्षा थोडा उंचावर असेल अशा स्थितीत ठेवाव. त्यानंतर डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या किंवा बर्फाची पिशवी ठेवावी. यानंतर थोड्या-थोड्या अंतराने थंड पाणी पिण्यास द्यावे. दरम्यानच्या काळात गरम किंवा उत्तेजीत पदार्थ अजिबात देऊ नये. रुग्णाच्या संपूर्ण शरीरावर थंड पाण्याचे टॉवेल, बेडशिट, पांढरे कापड ठेवावे.रुग्ण बेशुध्दावस्थेत असल्यास नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे. रुग्णाचा मृत्यू टाळण्यासाठी व तात्काळ उपाययोजनेकरिता सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आरोग्य पथक येथील वैद्यकिय अधिकाºयांनी व खाजगी रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाºयांनी आपल्या रुग्णालयामध्ये आवश्यक ती पूर्व तयारी करुन ठेवावी. शितकक्ष, हवेशिर खोलीमध्ये पंखे, कुलर आदी वातानुकूलीत साहित्य उपलब्ध ठेवावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल जे.रुडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंशीकांत शंभरकर यांनी केले.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर