शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गोरबंंजारा समाजाला संरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 21:09 IST

गोरबंजारा समाजाला संवैधानिक हक्क प्रदान करून तेलंगणा राज्यातील हिंसाचारग्रस्त समाजबांधवांना संरक्षण द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय गोरबंजारा संवैधानिक न्याय हक्क समितीने तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : न्यायहक्क महासमितीची शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गोरबंजारा समाजाला संवैधानिक हक्क प्रदान करून तेलंगणा राज्यातील हिंसाचारग्रस्त समाजबांधवांना संरक्षण द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय गोरबंजारा संवैधानिक न्याय हक्क समितीने तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण भारतात गोरबंजारा समाज साधारणपणे ४४ वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. १२ कोटींच्या जवळपास लोकसंख्या असणारी ही जमात प्रांतरचना करताना, सामाजिक आरक्षण देताना तसेच संवैैधानिक मानवाधिकार प्रदान करताना वंचित राहिली. १५ डिसेंबर २०१७ ला तेलंगणा राज्यात त्यांना राज्यघटनेच्या स्थापनेपासून मिळणाºया अनुसूचित जमातीच्या सवलती मिळू नयेत म्हणून काही जमातींकडून हिंसाचार घडवून आणण्यात आला. यात अनेक गोरबंजारा समाजाचे लोक मृत्यूमुखी पडले. काही जण गंभीर जखमी झाले. अनेकांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे गोरबंजारा समाजाला संवैैधानिक हक्क प्रदान करून हिंसाचारग्रस्तांना संरक्षण द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय गोरबंजारा संवैैधानिक न्यायहक्क महासमितीच्या वतीने मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.आजही हा समाज केवळ घाटी, वाणी, बानो, तांडा पंचायत व स्वतंत्र वसाहतीत प्राचीन प्रणालीनुसार जीवन जगत आहे. या समाजाची स्थिती अद्यापही हलाखीची आहे. त्यामुळे या समाजाला संवैैधानिक हक्क प्रदान करून संपूर्ण राज्यात संरक्षण द्यावे तसेच तेलंगणा राज्यात समाजाविरोधात हिंसाचार घडविणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी दत्तात्रय जाधव, आशिष चव्हाण, गुलाबसिंग राठोड, अरविंद जाधव, गोपाल जाधव यांनी केली आहे.