शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

‘प्रोजेक्ट विकास’मुळे जिल्ह्यातील नक्षल चळवळ आली बॅकफूटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

मुळात आता नक्षलवाद्यांची संख्या अतिशय कमी झाली आहे. त्यांच्या चळवळीत जाण्यासाठी युवा वर्ग तयार नाही. त्यामुळे छत्तीसगडमधील लोकांची भरती करून त्यांना इकडे पाठविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण हे करताना गावकऱ्यांशी त्यांचा पूर्वीसारखा संपर्क राहिलेला नाही. असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यामुळे सतत त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊन आपले स्थान बदलवत राहावे लागते.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचा विश्वास

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुर्गम भागातील नागरिकांना नक्षल चळवळीपासून दूर नेऊन विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘प्रोजेक्ट विकास’ राबविला जात आहे. केवळ शासनाच्या योजनांची माहिती वंचित लोकांपर्यंत पोहोचवून थांबायचे नाही तर त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ त्यांना देण्याचा प्रयत्न पोलिसांच्या पुढाकारातून केला जात आहे. त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहे. त्यामुळे नक्षल चळवळ आता बॅकफूटवर गेली आहे, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.साडेचार महिन्यांपूर्वी गडचिरोली पोलीस विभागाचे प्रमुख म्हणून धुरा स्वीकारताना गोयल यांनी या जिल्ह्यातील नक्षलवाद कमी करण्याचे आव्हानात्मक काम स्वीकारले. हे आव्हान पेलताना त्यांच्या काय योजना आहेत आणि त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करणार याबाबत लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक बाबी स्पष्ट केल्या. नक्षलवादाला नियंत्रित करताना एकावेळी अनेक आघाड्यांवर काम करावे लागते. नक्षलवाद्यांच्या गोळीला गोळीने उत्तर देण्यासोबत त्यांना कुठेच आश्रय मिळणार नाही अशी व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी मंदावलेल्या विकासाच्या प्रक्रियेला गती देणे हेच एक आव्हान आहे. नक्षल्यांनी कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी ते आता दुर्गम भागातील विकासाची प्रक्रिया थांबवू शकणार नसल्याचे ते म्हणाले.मुळात आता नक्षलवाद्यांची संख्या अतिशय कमी झाली आहे. त्यांच्या चळवळीत जाण्यासाठी युवा वर्ग तयार नाही. त्यामुळे छत्तीसगडमधील लोकांची भरती करून त्यांना इकडे पाठविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण हे करताना गावकऱ्यांशी त्यांचा पूर्वीसारखा संपर्क राहिलेला नाही. असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यामुळे सतत त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊन आपले स्थान बदलवत राहावे लागते. यातून त्यांच्यात पूर्वीसारखी एनर्जीही राहिलेली नाही. त्यामुळे आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना अटक झाली, तर काही चकमकीत मारले गेले. नक्षलवाद्यांचे मनुष्यबळच नाही तर मनोबलही कमी झाले आहे. हे पोलीस यंत्रणेचे मोठे यश असल्याचे पोलीस अधीक्षक गोयल म्हणाले. जिल्ह्यात इतर गुन्ह्यांच्या नियंत्रणासाठी पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे का, याबद्दल ते म्हणाले, ही परिस्थिती राज्यात सर्वत्रच आहे. यावर्षी कोविड-१९ मुळे निधीची थोडी कमतरता आहे. तरीही कुठलेही काम अडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. या जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ऐच्छिक ठिकाणी जाण्याची मुभा आहे. 

आत्मसमर्पितांसाठी ‘ब्रिज कोर्स’चा प्रस्तावआतापर्यंत ६०० वर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यातील बहुतांश लोक पाचवी ते सातवीपर्यंत शिकलेले आहेत. त्यांना आयटीआयसारखे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यातून मध्यम मार्ग काढून त्यांना आयटीआय प्रवेशासाठी दहावीशी समकक्ष ठरेल असा ‘ब्रिज कोर्स’ करण्याची मुभा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याची माहिती यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिली.

दुर्गम भागातील युवक-युवतींना रोजगारनागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील युवक-युवतींना विविध ठिकाणी रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात ४०० जणांना सुरक्षा रक्षक, १५० जणांना हॉटेल आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात, १५० युवतींना नर्स म्हणून नोकरी मिळवून दिली. ३१५ दिव्यांगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र, १२० जणांना मत्स्य व कुकुटपालनाचा व्यवसाय अशा माध्यमातून जोडण्यात आले. याशिवाय दुर्गम भागात आधार नोंदणी शिबिर घेऊन योजनांचा लाभ देण्याचा मार्ग प्रशस्त केला.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस