शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

जिमलगट्टा तालुक्याची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:42 IST

अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी मागील पंधरा वर्षांपासून शासनाकडे केली जात आहे.

ठळक मुद्देपरिसरात ६७ गावांचा समावेश : नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

आॅनलाईन लोकमतजिमलगट्टा : अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी मागील पंधरा वर्षांपासून शासनाकडे केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच झाले. जिमलगट्टा परिसरातील नागरिकांना विविध शासकीय कामे करताना त्रास होत असल्याने या तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिमलगट्टाला भेट दिली असता, त्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, जिमलगट्टा मंडळ कार्यालयांतर्गत जिमलगट्टा, वेडमपल्ली, उमानूर, मरपल्ली, रेगुलवाही, गोविंदगाव, किष्टापूर, देचली, पेठा, कोंजेड, रेनपल्ली, कमलापूर, राजाराम, खांदला, दामरंचा आदी ग्राम पंचायतीचा समावेश होतो.या मंडळ कार्यालयांतर्गत ६७ गावांचा समावेश असून ४० ते ५० हजार लोकसंख्या आहे. लोवा, कल्लेड, आसली, मुखानपल्ली येथील नागरिकांना १० ते १५ किमीची पायपीट करून बस पकडावी लागते. तालुका स्तरावरील कामे करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. यात नागरिकांना आर्थिक, मानसिक त्रास होतो.२००२ मध्ये जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील चार नवीन तालुक्याच्या निर्मितीचा ठराव सादर करून त्यास मंजुरी प्रदान करण्यात आली. परंतु अद्यापही ही मागणी शासनस्तरावर प्रलंबित आहे.