शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

भयभीत गावकऱ्यांना पोलिसांचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 11:50 PM

नक्षलवाद्यांनी २२ जानेवारी रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर येथील तीन निष्पाप आदिवासी नागरिकांची निर्घृण हत्या केल्यानंतर नक्षल्यांच्या भीतीपोटी धास्तावलेल्या कसनासूर येथील नागरिकांनी ताडगाव पोलीस मदत केंद्राचा आश्रय घेतला.

ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाºयांची भेट : कुटुंबीयांना आर्थिक मदत देणार

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : नक्षलवाद्यांनी २२ जानेवारी रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर येथील तीन निष्पाप आदिवासी नागरिकांची निर्घृण हत्या केल्यानंतर नक्षल्यांच्या भीतीपोटी धास्तावलेल्या कसनासूर येथील नागरिकांनी ताडगाव पोलीस मदत केंद्राचा आश्रय घेतला. गेल्या तीन दिवसांपासून नागरिक मदत केंद्राच्या परिसरात वास्तव्यास आहेत. दरम्यान गुरूवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ताडगाव पोलीस मदत केंद्रात जाऊन या नागरिकांशी संवाद साधला. नक्षल्यांना घाबरण्याचे कारण नाही, पोलीस विभाग आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, असा दिलासा यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिला.गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोहित गर्ग, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी ताडगाव पोलीस मदत केंद्रात गुरूवारी (दि.२४) भेट देऊन कसनासूरच्या नागरिकांची भेट घेतली. नक्षल्यांकडून हत्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना दिलासा दिला.२२ एप्रिल २०१८ रोजी बोरीया कसनासूर येथे झालेल्या नक्षल घटनेचा व कसनासूर गावातील तीन व्यक्तींच्या हत्येच्या घटनेशी काहीही संबंध नाही, असा खुलासा वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी यावेळी केला.पोलीस जनतेची मदत करायला कधीही सक्षम आहेत. नक्षलवादी आदिवासींचे शोषण करीत आहेत. नक्षलवाद्यांमुळे आदिवासी भागातील विकास कामांना अडथळा निर्माण होत आहे. आम्ही तुमच्या अडचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.नक्षल चळवळीमध्ये सामिल झालेल्या लोकांना विविध प्रकारच्या योजना राबवून त्यांचे आत्मसमर्पण घडवून आणले. यापुढेही तसा प्रयत्न सुरू राहिल. आम्ही आदिवासींचे कदापी शोषण होऊ देणार नाही. नक्षलग्रस्त भागातील विकासकामे पूर्ण करणार, असे अभिवचनही पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.यावेळी ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी समीर दाभाडे, सीआरपीएफचे सहायक कमांडंट राहुल नामदे होते. पोलीस उपनिरिक्षक पुनम गोरे, एसआरपीएफचे पीएसआय शिंदे, महसूल मंडळ अधिकारी गड्डमवार आदी उपस्थित होते.आज गावकरी स्वगावी परतणारतिघांच्या हत्येनंतर गेल्या तीन दिवसांपासून ताडगाव पोलीस मदत केंद्रात आश्रयाला आलेले बहुतांश गावकरी पोलिसांच्या दिलाशानंतर शुक्रवारी स्वगावी कसनासूरला जाणार आहेत. पीडित तीन कुटुंबाना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदतही दिली जाणार आहे. तसेच गावात न जाता इतरत्र जाऊ इच्छिणाºयांनाही पोलिसांकडून योग्य ते सहकार्य केले जाणार आहे. मृत रैनू मडावीच्या पत्नीला कंत्राटी नोकरी देणार असल्याचे यावेळी डीआयजी शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस