शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

पोलिसांनी केला मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

सिरकोंडा नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. पाईप टाकून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पाण्याबरोबर येणारा गाळ पाईपासमोर जमा झाला होता. काही प्रमाणात पाईप सुद्धा बुजले होते. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होत होती. परिणामी झिंगानूरसह इतर गावांचा संपर्क तुटत होता. गाळ काढणे आवश्यक झाले होते.

ठळक मुद्देरस्त्याची दुरूस्ती : सिरकोंडा नाल्याच्या पुलाखालील गाळ काढला

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरकडे जाणाऱ्या मार्गावर सिरकोंडाजवळ असलेल्या नाल्याच्या पुलाच्या पाईपमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने थोडाही पाऊस झाला तरी पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे रहदारी ठप्प पडत होती. झिंगानूर उपपोलीस स्टेशनच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने पाईपमधील माती काढली.सिरकोंडा नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. पाईप टाकून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पाण्याबरोबर येणारा गाळ पाईपासमोर जमा झाला होता. काही प्रमाणात पाईप सुद्धा बुजले होते. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होत होती. परिणामी झिंगानूरसह इतर गावांचा संपर्क तुटत होता. गाळ काढणे आवश्यक झाले होते. बांधकाम विभागाकडे तक्रार केली तरी बांधकाम विभागाकडून यावर वेळीच उपाययोजना होणे अशक्य होते. ही बाब झिंगानूर उपपोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यांच्या लक्षात आली. त्यांनी एक खासगी जेसीबी भाड्याने घेतला. पाईपच्या समोर असलेली रेती व गाळ दूर करून पाण्याला मार्ग मोकळा करून दिला. या कामात झिंगानूर व परिसरातील गावकºयांनी सुद्धा मदत केली आहे. मात्र या सर्व बाबीसाठी पोलिसांचे मोठे सहकार्य लाभले आहे. नागरिकांचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांच्या अडचणी दूर करण्याचे काम पोलीस करीत असल्याने पोलिसांच्या कार्याची प्रशंसा होत आहे. नाल्यातून सतत पाणी वाहत असल्याने नाल्याजवळचा रस्ता वाहून गेला. दगड बाहेर निघले होते. नागरिकांनी श्रमदान करून हा रस्ता सुद्धा दुरूस्त केला आहे.उंच पूल बांधण्याची गरजसिरकोंडा गावाच्या पलिकडे झिंगानूरसह अनेक गावे आहेत. या गावांकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून बस, खासगी वाहने व इतर मालवाहू वाहनांची वर्दळ राहते. सिरकोंडा गावाजवळ असलेल्या नाल्यावरचे पूल कमी उंचीचे आहे. त्यामुळे थोडा मोठा पाऊस झाल्यानंतर पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होऊन रहदारी ठप्प होते व पुढील गावांचा संपर्क तुटते. पावसाळ्यात अनेकवेळा संपर्क तुटत असल्याने या ठिकाणी उंच पूल बांधण्याची गरज आहे.

टॅग्स :Policeपोलिस