शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

पोलिसांनी केला मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

सिरकोंडा नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. पाईप टाकून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पाण्याबरोबर येणारा गाळ पाईपासमोर जमा झाला होता. काही प्रमाणात पाईप सुद्धा बुजले होते. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होत होती. परिणामी झिंगानूरसह इतर गावांचा संपर्क तुटत होता. गाळ काढणे आवश्यक झाले होते.

ठळक मुद्देरस्त्याची दुरूस्ती : सिरकोंडा नाल्याच्या पुलाखालील गाळ काढला

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरकडे जाणाऱ्या मार्गावर सिरकोंडाजवळ असलेल्या नाल्याच्या पुलाच्या पाईपमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने थोडाही पाऊस झाला तरी पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे रहदारी ठप्प पडत होती. झिंगानूर उपपोलीस स्टेशनच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने पाईपमधील माती काढली.सिरकोंडा नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. पाईप टाकून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पाण्याबरोबर येणारा गाळ पाईपासमोर जमा झाला होता. काही प्रमाणात पाईप सुद्धा बुजले होते. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होत होती. परिणामी झिंगानूरसह इतर गावांचा संपर्क तुटत होता. गाळ काढणे आवश्यक झाले होते. बांधकाम विभागाकडे तक्रार केली तरी बांधकाम विभागाकडून यावर वेळीच उपाययोजना होणे अशक्य होते. ही बाब झिंगानूर उपपोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यांच्या लक्षात आली. त्यांनी एक खासगी जेसीबी भाड्याने घेतला. पाईपच्या समोर असलेली रेती व गाळ दूर करून पाण्याला मार्ग मोकळा करून दिला. या कामात झिंगानूर व परिसरातील गावकºयांनी सुद्धा मदत केली आहे. मात्र या सर्व बाबीसाठी पोलिसांचे मोठे सहकार्य लाभले आहे. नागरिकांचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांच्या अडचणी दूर करण्याचे काम पोलीस करीत असल्याने पोलिसांच्या कार्याची प्रशंसा होत आहे. नाल्यातून सतत पाणी वाहत असल्याने नाल्याजवळचा रस्ता वाहून गेला. दगड बाहेर निघले होते. नागरिकांनी श्रमदान करून हा रस्ता सुद्धा दुरूस्त केला आहे.उंच पूल बांधण्याची गरजसिरकोंडा गावाच्या पलिकडे झिंगानूरसह अनेक गावे आहेत. या गावांकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून बस, खासगी वाहने व इतर मालवाहू वाहनांची वर्दळ राहते. सिरकोंडा गावाजवळ असलेल्या नाल्यावरचे पूल कमी उंचीचे आहे. त्यामुळे थोडा मोठा पाऊस झाल्यानंतर पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होऊन रहदारी ठप्प होते व पुढील गावांचा संपर्क तुटते. पावसाळ्यात अनेकवेळा संपर्क तुटत असल्याने या ठिकाणी उंच पूल बांधण्याची गरज आहे.

टॅग्स :Policeपोलिस