लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरात कोरोनाने तांडव घातले असताना गडचिरोली जिल्हा अजुनही कोरोनामुक्त आहे. याचे मोठे श्रेय जिल्ह्याच्या सीमा सांभाळणाऱ्या पोलिसांना तसेच जिल्ह्यांतर्गत वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाºया वाहतूक नियंत्रक पोलिसांना द्यावे लागेल.कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू केली. जिल्ह्यातील अनेक नागरिकांसाठी संचारबंदी हा आजपर्यंत न ऐकलेला शब्द होता. त्यामुळे अनेकांकडून संचारबंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न होत होता. मात्र गडचिरोली पोलिसांनी कधी दंडुक्यांचा वापर करत तर कधी प्रेमाने नागरिकांना समजावून सांगत २१ दिवसांची संचारबंदी यशस्वीपणे पूर्ण केली. पोलिसांमुळेच संचारबंदी काय असते हे अनेक युवकांना कळले. पोलिसांच्या धाकामुळे नागरिक व दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आहेत. तसेच वेळोवेळी तपासणी केली जात असल्याने अनावश्यक फिरण्याची हिंमत तरूण वर्ग सुध्दा करताना आता दिसत नाही.संचारबंदीचा निर्णय घेतानाच जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यानुसार जिल्हा सीमांवर पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. दुसºया जिल्ह्यातून येणाºया व्यक्तीला प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे देशभरात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत असताना गडचिरोली जिल्हा मात्र कोरोनामुक्त आहे. याचे सर्वात मोठे श्रेय पोलीस विभागालाच द्यावे लागेल. हे कर्तव्य बजावताना पुरूष कर्मचाऱ्यांसोबत महिला पोलीस कर्मचारीही आपण पूर्ण सक्षमपणे कर्तव्य बजावू शकतो याचा परिचय देताना दिसत आहे.अनेक लोक कोरोनाच्या धाकाने घराबाहेर पडण्यासही घाबरतात, पण पोलीस कर्मचारी अनेक तास चौका-चौकात, ऊन्हात उभे राहून कर्तव्य बजावत आहेत.कोरोनाशी लढताना नक्षलविरोधी आघाडीवरही पुढेपोलीस दुसऱ्या कामात व्यस्त झाल्यानंतर याचा गैरफायदा घेत नक्षलवादी डोके वर काढतात, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे कोरोनाविरोधात लढताना शहरात व नाक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात असला तरी याचवेळी नक्षलविरोधी अभियानसुध्दा तेवढ्याच सक्षमपणे सुरू आहे. त्यामुळे नक्षलविरोधी लढा असो की कोरोनाविरूद्धचा लढा, पोलिसांच्या कर्तव्यकठोरतेमुळे जिल्हावासिय बºयाच अंशी चिंतामुक्त आहेत.
डोळ्यात तेल घालून पोलीस बजावताहेत ड्युटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:01 IST
गडचिरोली पोलिसांनी कधी दंडुक्यांचा वापर करत तर कधी प्रेमाने नागरिकांना समजावून सांगत २१ दिवसांची संचारबंदी यशस्वीपणे पूर्ण केली. पोलिसांमुळेच संचारबंदी काय असते हे अनेक युवकांना कळले. पोलिसांच्या धाकामुळे नागरिक व दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आहेत. तसेच वेळोवेळी तपासणी केली जात असल्याने अनावश्यक फिरण्याची हिंमत तरूण वर्ग सुध्दा करताना आता दिसत नाही.
डोळ्यात तेल घालून पोलीस बजावताहेत ड्युटी
ठळक मुद्देजिल्ह्याच्या सीमांवर अंमलबजावणी : जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात महत्त्वाचा वाटा