शांतीदुताची भूमिका बजावा
By Admin | Updated: September 5, 2016 01:33 IST2016-09-05T01:33:07+5:302016-09-05T01:33:07+5:30
गणेश उत्सवादरम्यान धार्मिक व सामाजिक सलोखा कायम ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी

शांतीदुताची भूमिका बजावा
आरमोरीत शांतता बैठक : गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ठाणेदारांचे आवाहन
आरमोरी : गणेश उत्सवादरम्यान धार्मिक व सामाजिक सलोखा कायम ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गणेश मंडळांनी शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात उत्सव साजरा करावा तसेच ध्वनीप्रदूषणाचा इतरांना त्रास होऊ नये, याकरिता ध्वनी प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी गणेश मंडळांनी खबरदारी घ्यावी, पोलीस आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय साधण्यासाठी नागरिकांनी शांतीदुताची भूमिका स्वीकारून पोलीस विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरमोरी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक शनिवारी पार पडली. यावेळी ठाणेदार पाटील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पाटील, मोरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता बोरकर, जि. प. सदस्य लक्ष्मी मने, किशोर वनमाळी, विजयकुमार ठवरे, अशोक वाकडे, वेणू ढवगाये, हेमलता वाघाडे, काशिनाथ शेबे, विश्वनाथ गणवीर, नंदू पेट्टेवार, राजू अंबानी, मुरलीधर भानारकर, देविदास बारसागडे, पंकज खरवडे, कल्पना तिजारे, सुनील नंदनवार, संगीता रेवतकर, मिलींद खोब्रागडे, गणेश वनवे यांच्यासह आरमोरी शहरातील गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, पत्रकार उपस्थित होते. (वार्ताहर)
बैठकीत मांडल्या अडचणी
गणेश उत्सवादरम्यान निर्माण होणाऱ्या अनेक समस्या, अडचणी, नागरिकांनी बैठकीत मांडल्या. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाला काही सूचनाही केल्या व स्वत:चे मतही मांडले. नागरिकांच्या समस्या पोलीस अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या व त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.