पीक लागवडीस मदत

By Admin | Updated: June 8, 2014 23:52 IST2014-06-08T23:52:49+5:302014-06-08T23:52:49+5:30

शासनाने शेतकर्‍यांना खरीप, रब्बी हंगामात आपल्या शेतात पीक लागवड करता यावी यासाठी किसान क्रेडीट कार्ड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत

Peak cultivation help | पीक लागवडीस मदत

पीक लागवडीस मदत

कर्ज सुविधा : किसान क्रेडिट कार्ड योजना ठरताहे नवसंजीवनी
गडचिरोली : शासनाने शेतकर्‍यांना खरीप, रब्बी हंगामात आपल्या शेतात पीक लागवड करता यावी यासाठी किसान क्रेडीट कार्ड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत गतवर्षी २0१३-१४ च्या हंगामात जिल्ह्यात १७ हजार ७४५ किसान क्रेडीट कार्डधारक शेतकर्‍यांना ५१८२.९२ लक्ष रूपयाचे कर्ज वितरित करण्यात आले.
गडचिरोली जिल्हा हा कृषीप्रदान जिल्हा असून जिल्ह्यातील ७0 टक्के जनता ग्रामीण भागात वास्तव्य करते. ग्रामीण भागातील नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. शेतीसोबतच शेतीपुरक व्यवसायही केले जातात. मात्र जिल्ह्यात सधन शेतकर्‍यांची संख्या फारच कमी आहे. ८0 टक्क्यापेक्षा अधिक शेतकरी अद्यापही दुष्काळाच्या झळा सोसतच आहेत. गडचिरोली जिल्ह्यात अतवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण होते. परिणामी हजारो हेक्टर शेतीचे पुरामुळे नुकसान होते. यामुळे शेतकरी नेहमी संघर्षमय जीवन घालवित असते. अशा परिस्थितीत शासनाची किसान क्रेडीट कार्ड योजना वरदान ठरली आहे. हातात पैसा उपलब्ध नसलेल्या गरीब सर्वसामान्य शेतकर्‍यांना या योजनेंतर्गत कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचा गतवर्षी जिल्ह्यातील १७ हजार ७४५ शेतकर्‍यांनी लाभ घेतला.
गतवर्षी २0१३-१४ मध्ये किसान क्रेडीट कार्ड योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बाराही तालुक्यात मिळून १७ हजार ७३३ शेतकर्‍यांनी कार्ड तयार केले. हे शेतकरी या योजनेंतर्गत बँकांचे सभासद आहे. १७ हजार ७३३ शेतकर्‍यांना ५१७६.९२ लक्ष रूपयाचे कर्ज वितरित करण्यात आले. रब्बी हंगामात जिल्ह्यातील १२ शेतकरी सभासदांना ६ लाख रूपयाचे कर्ज वितरित करण्यात आले. शासनाच्यावतीने राष्ट्रीयकृत व मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत या योजनेंतर्गत ३१ मार्चपर्यंत शुन्य टक्के कर्ज वितरित केल्या जाते. मुदतीनंतर या कर्जावर व्याज आकारल्या जाते. किसान क्रेडीट कार्ड योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी खरीप, रब्बी हंगामात पीक लागवड करून आर्थिक उन्नती साधली आहे.
रोहिणी नक्षत्र संपला असून रविवारपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली आहे. मात्र जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यात उष्णतेचा पारा कायमच आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेतीपूर्व मशागतीचे काम आटोपली आहेत. आता शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान खरीप हंगामात पीकाची लागवड करण्याकरीता कर्ज घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी आतापासूनच कागदपत्राची जुळवाजुळव करीत आहेत. यामुळे राष्ट्रीयकृत व मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकरी येरझारा मारीत असल्याचे दिसून येत आहे. मागास, नक्षलग्रस्त, आदिवासी बहूल गडचिरोली जिल्ह्यात  किसान क्रेडीट कार्ड योजनेची पीक लागवडीसाठी शेतकर्‍यांना चांगली मदत होत असल्याच्या प्रतिक्रीया अनेक शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
 

Web Title: Peak cultivation help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.