देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कुणबी समाज संघटनेने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
अनिष्ठ रूढींनी पिचलेल्या तेली समाजाला समाज परिवर्तनाची आवश्यकता आहे. साडी व गाडीची जेवढी काळजी घेतो, तेवढीच काळजी आपल्या मुलांची घेऊन त्यांना घडविले तर सुदृढ व सुसंस्कृत समाज निर्माण होण्यास मदत होईल. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे शालेय दिन साजरा करणाऱ्या सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, फिशिपचा लाभ देणे बंद केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यांची उपासमार होत आहे. ...
गडचिरोली तालुक्यातील कोटगल आणि आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन योजनांच्या कामांनी आता वेग घेतला आहे. गेली अनेक महिने पाटबंधारे विभागाकडे अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे या योजनांची कामे रखडली होती. ...
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, या प्रमुख मागणीसह ओबीसी समाजाच्या विविध समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टी आरमोरी तालुका ओबीसी सेलच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आ ...
जिल्ह्याच्या दुर्गम, डोंगराळ व आदिवासी भागातील विशेषत: जिल्ह्याच्या सात तालुक्यातील विजेची समस्या सोडविण्यासाठी २०१६-१७ या सत्रासाठी प्रायोगिक तत्त्वावर ग्राम विद्युत सेवकाची नियुक्ती करण्यात आली होती. ...
शेतकऱ्यांना पुरेशी सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी देसाईगंज तालुक्यातील कुरुड-कोंढाळा शिवपांदणलगत लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र सदर बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी पर्याप्त सोयीच उपलब्ध करून ..... ...
हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कृषीमंत्र्यांनी शेतकºयांना नापिकीसाठी राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाºया मदतीची घोषणा केली. खरं म्हणजे मदतीची नुसती घोषणाच करायची होती, प्रत्यक्ष लाभ लगेच द्यायचा नव्हता. ...
आदिवासी विकास नागपूर विभागाच्या तीन दिवशीय क्रीडा संमेलनाचा सोमवारीं समारोप झाला. यात भामरागड प्रकल्पाने विजेते पद प्राप्त केले. विशेष म्हणजे, भामरागड प्रकल्प सलग ११ वेळा विभागीय स्पर्धांचा विजेता ठरला आहे. ...