आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी शासनाकडून प्राप्त झालेला अधिकाधिक निधी खर्च होऊन विकासाला गती मिळावी, या उद्देशाने सुमारे ३० कोटी ७ लाख रूपये निधीचे पुनर्विनियोजन करण्यात आले. ...
परिसरातील शंकरनगरातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याकरिता २० दिवसांपूर्वी रस्त्यावर मोठी बोल्डर गिट्टी पसरविण्यात आली. परंतु अद्यापही या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही. परिणामी गावातीलही नागरिकांना आवागमनास अडचण येत आहे. ...
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रासह तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील हजारो भाविक येणार आहेत. ...
भागवताच्या माध्यमातून सर्व जातीचे लोक एकत्र येतात. अशाच एकोपा गावात कायम ठेवून या एकोप्याचा वापर गाव विकासाठी करावा, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. तुळशी येथील भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. ...
एटापल्ली तालुक्यातील कुंजेमर्का येथील ग्रामस्थांनी पोलीस अधिकाºयांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी गट्टा येथील पोलीस मदत केंद्रात येऊन त्यांच्याकडील तीन भरमार बंदुका व एक भरमार रायफल जमा केली. ...
गृहमंत्रालय भारत सरकारच्या वतीने देशभरातील पोलीस दलातील जवानांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती शौर्यपदकाची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. ...
कोरची पंचायत समितीच्या सभापती कचरीबाई काटेंगे यांनी सोमवारी येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाच्या कार्यालयाला भेट दिली असता, येथे एकच कर्मचारी उपस्थित होता. अधिकाऱ्यांसह तब्बल १६ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. ...
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुण व कौशल्यांना वाव मिळण्यासाठी या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा महोत्सवातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार युवावर्गात रुजविण्यासोबतच त्यांच्या समाजकार्य व राष्ट्रकार्याची ओढ निर्माण करण्याच्या उद्देशाने येत्या २७ व २८ जानेवारीला पंधरावे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन धानोरा तालुक् ...
सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी सतर्कता बाळगणे आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच विविध गुन्हे टाळता येऊ शकतात याची जाणीव ठेवून व्यवहार करण्याची गरज आहे, असे आवाहन अॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे यांनी केले. ...