शहरी भागासह ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली बससेवा भंगार अवस्थेमुळे प्रवाशांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. अहेरी बस आगारातील अनेक बसेस भंगार झाल्याने पाऊस सुरू असताना त्या गळतात. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. ...
शहरातील भूमिगत पुलाच्या शेजारी रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका वेडसर महिलेने निरागस बालकाला जन्म दिला. प्रसुतीच्या वेदनेने विव्हळत असलेल्या या महिलेवर शहरातील डॉक्टर चंद्रकांत नाकाडे यांनी तत्परतेने उपचार करून तिची प्रसुती केली. नवजात बालक व मह ...
गोंडवाना विद्यापीठात पुरेसे पद्व्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी २० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. सिध्दार्थ विन ...
खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा केली. मागण्यांचे निवेदन सादर केले. खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त व अविकसीत आहे. ...
शुक्रवारी रात्री गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तब्बल नऊ तालुक्याांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक मार्ग बंद पडले आहेत. भिंत कोसळल्याने वित्त हाणीसुद्धा झाली आहे. ...
वीज युनिटचे दर कमी करावे, आदीसह विजेच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती एटापल्लीच्या वतीने १ आॅगस्ट रोजी गुरूवारी एटापल्लीच्या महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली. ...
नक्षलवादी विकास कामांना विरोध करतात. त्यामुळे भामरागड तालुक्यातील नागरिकांनी नक्षलवाद्यांना मदत करून आपले जीवन उद्ध्वस्त करू नये, असे आवाहन भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले. ...
गडचिरोली शहरातील मुख्य तसेच वर्दळीच्या अंतर्गत रस्त्यांची दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जाते. मात्र पावसाळा आला की, शहरातील अनेक रस्ते पुन्हा जैसे थे होतात. दरवर्षी येणारा हा अनुभव लक्षात घेऊनही स्थानिक प्रशासन सुस्त आहे. ...
एटापल्लीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्याच्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. सदरपूल कधीही वाहून जाण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे, या पुलाच्या डागडुजीवर आजपर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र दरवर्षी पुलाचा काही भाग वाहून जात आहे. ...
गुरूवारी रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा नदी, नाल्यांना पूर येण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. रात्री शहरात पाणी शिरण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी ...