शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

बचत गटांना वाटलेले धान रोवणी यंत्र भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 12:54 AM

जिल्हाभरातील १२४ बचत गटांना दोन वर्षांपूर्वी धान रोवणी यंत्रांचे वितरण केले होते. दोन कोटी रूपये किमतीचे हे साहित्य देखभाल व दुरूस्तीअभावी बंद पडले असून पुन्हा पारंपरिक रितीनेच धानाची रोवणी करण्याकडे शेतकरीवर्ग वळला आहे.

ठळक मुद्देनियोजनशून्यतेचा परिणाम : सुमारे दोन कोटी रूपयांचा निधी पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील १२४ बचत गटांना दोन वर्षांपूर्वी धान रोवणी यंत्रांचे वितरण केले होते. दोन कोटी रूपये किमतीचे हे साहित्य देखभाल व दुरूस्तीअभावी बंद पडले असून पुन्हा पारंपरिक रितीनेच धानाची रोवणी करण्याकडे शेतकरीवर्ग वळला आहे.मानव विकास मिशन, जिल्हा वार्षिक योजना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत २०१३-१४ मध्ये ३७ व २०१५-१६ मध्ये ८७ शेतकरी बचतगटांना ९० टक्के अनुदानावर धान रोवणी यंत्रांचे वितरण करण्यात आले होते. अनुदानावर रोवणी यंत्र मिळत असल्याने बचतगटांनी सदर यंत्र मिळविण्यासाठी मोठी धावपळ केली होती. संबंधित यंत्राची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबंधित बचतगटावरच सोपविली होती. सदर यंत्र आंध्रप्रदेशातून एका कंपनीमार्फत आणण्यात आले होते. मात्र या यंत्रांचे सुटे भाग गडचिरोली जिल्ह्यात मिळत नसल्याने तसेच त्याची दुरूस्ती करणारे कारागिरही मिळत नसल्याने बंद पडलेले धान रोवणी यंत्र सुरूच झाले नाही.यंत्रांचे वितरण झाल्यानंतर सदर बचतगट योग्य पद्धतीने यंत्र चालवित आहे काय? सदर यंत्र चालविताना कोणत्या अडचणी येत आहेत, या सर्व बाबी समजून घेण्यासाठी कृषी विभागाने लक्ष देणे आवश्यक होते. मात्र धान रोवणी यंत्र वितरित केल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही हात वर केले आहे. अल्पावधीतच काही बचतगटांमध्ये भांडण निर्माण झाले. त्यामुळे यंत्राकडे दुर्लक्ष झाले आहे. एकूण १२४ यंत्रांपैकी ९५ टक्के यंत्र बंद पडले आहेत. या यंत्रांवर जवळपास दोन कोटी रूपयांचा निधी खर्च झाला आहे. हा सर्व निधी पाण्यात गेला आहे.सर्वच विभागांनी केले हात वरधान रोवणी यंत्रांचे वितरण मानव विकास मिशनचा निधी, जिल्हा वार्षिक योजना व आदिवासी उपयोजनेच्या निधीतून करण्यात आले. त्याला तांत्रिक मार्गदर्शन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले होते. वितरण झाल्यानंतर मात्र या सर्वच विभागांनी या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी योग्य मार्गदर्शनाअभावी सदर यंत्र धूळखात पडून आहेत.उणिवा लक्षात न घेताच यंत्रांचे वितरणधान रोवणी यंत्राच्या सहाय्याने रोवणी करावयची असल्यास धानाचा परा मॅट नर्सरीवर टाकावा लागतो. पºयाचे १५ ते २० दिवसांच्या कालावधीत रोवणे होणे आवश्यक आहे. पºयाची उंची एकदम वाढल्यास यंत्राने रोवणी करताना अडचण निर्माण होते. रोवणी वेळेवर होण्यासाठी पाऊस पडला किंवा नाही पडला तरी स्वत:ची सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा नाही. पाऊस पडला नाही तर कधीकधी दीड महिना धान रोवणीला विलंब होते. त्यामुळे धान यंत्राच्या सहाय्याने रोवणी शक्य नाही. ही बाब जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अधिकारी व कृषी सभापतींनी उपयोगिता लक्षात न घेताच नावीण्यपूर्ण उपक्रम म्हणून शेतकºयांच्या माथी रोवणी यंत्र मारले. मात्र जो परिणाम व्हायचा होता, तो आता दिसून येत आहे.शेतीचे यांत्रिकीकरण वाढावे, यासाठी शासनाकडून अनुदावर नवीन यंत्र उपलब्ध करून दिले जात आहेत. तर दुसरीकडे शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या यंत्रांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा परिषदेने काही निधी धान रोवणी यंत्रांच्या दुरूस्तीसाठी उपलब्ध करावा. त्याचबरोबर संबंधित यंत्र दुरूस्त करणारे कारागीर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अन्यथा सदर यंत्र भंगारात विकावे लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती