शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

१० गावात धानबिज प्रक्रिया प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:00 AM

बियाणांवर बिज प्रक्रिया बुरशीचा नाश होतो. बियाणांची उगमवण क्षमता वाढते. व बियाणे सक्षक्त होते. प्रक्रिया केलेल्या बियाणांमुळे उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहज घरी करता येणारी धानबिज प्रक्रिया करावी, बाजारातील महागडे धानबियाणे खरेदी करून तोट्याची शेती करू नये, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील १० गावांमध्ये बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : महागडे धान बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांनी टाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांसह कृषी विभागाचे कर्मचारीही शेतीबाबत सतर्क झाले आहेत. तालुका कृषी कार्यालय आरमोरीच्या वतीने ग्रामीण भागात धानबिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.बियाणांवर बिज प्रक्रिया बुरशीचा नाश होतो. बियाणांची उगमवण क्षमता वाढते. व बियाणे सक्षक्त होते. प्रक्रिया केलेल्या बियाणांमुळे उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहज घरी करता येणारी धानबिज प्रक्रिया करावी, बाजारातील महागडे धानबियाणे खरेदी करून तोट्याची शेती करू नये, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील १० गावांमध्ये बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. वैरागड, मोहझरी, परसवाडी, खडकी, कोरेगाव, पिसेवडधा, नरोटी (माल), डार्ली, बोरी आदी गावात प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर गावाच्या मध्यभागी तसेच मोकळ्या जागेत फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून कृषी विभागाच्या वतीने बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी एस.पी.ढोणे, कृषी पर्यवेक्षक जी.एन.जाधवर, कृषी सहायक अमित केराम, कोविद मडकाम, लीना करंगामी आदी उपस्थित होते.याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी एस.एस.ढगे यांनी सदर १० गावांमध्ये शेतकऱ्यांना बिज प्रक्रिया, लागवडीची पद्धती, यंदाच्या खरीप हंगामात होणारा पाऊस आदीबाबत मार्गदर्शन केले. आरमोरी तालुक्याच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व शेतीमशागतीची कामे सुरू आहेत. शेताची स्वच्छता करणे, शेतात सेंद्रिय खत टाकणे, काटेरी झाडेझुडूपे तोडणे आदी कामे सकाळच्या सुमारास शेतकरी व शेतमजूर करीत असताना दिसून येत आहे. काही शेतकरी पीक लागवडीसाठी पैशाची जुळवाजुळव करीत असतानाही पीक कर्जासाठी धावपळ सुरू आहे.अशी करा बिज प्रक्रियाएका बादलीमध्ये १० लीटर पाणी घ्यावे. मिठ द्रावण ढवळून घ्यावे. या द्रावणात धानबियाणे टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे द्रावणाबाहेर करून दोन ते तीन वेळा या बियाणाला स्वच्छ पाण्याने धुवावे. सदर बियाणे सावलीमध्ये २४ तास वाळवावे. प्रक्रिया केलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती