शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
3
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
4
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
5
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
6
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
7
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
8
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
9
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
10
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
11
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
12
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
13
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
14
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
15
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
16
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
17
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
18
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
19
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

बारदाण्याअभावी धान खरेदी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:06 AM

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळामार्फत धानोरा तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र धान खरेदी केंद्रांवर मागील काही दिवसांपासून बारदानाचा तुटवडा असल्याने धान खरेदी रखडली आहे. परिणामी हजारो क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडून आहेत.

ठळक मुद्देकेंद्रांवर तुटवडा : एकाही शेतकऱ्याला चुकाºयाची रक्कम मिळाली नाही

घनश्याम म्हशाखेत्री ।लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळामार्फत धानोरा तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र धान खरेदी केंद्रांवर मागील काही दिवसांपासून बारदानाचा तुटवडा असल्याने धान खरेदी रखडली आहे. परिणामी हजारो क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडून आहेत.शेवटच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषिपंप, डिझेल इंजिन लावून धानाची शेती पिकविली. यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असली तरी अपेक्षित उत्पन्न झाले नाही. धानाच्या लागवडीसाठी केलेल्या खर्चाची परतफेड करण्याकरिता शेतकरी धान खरेदी केंद्रावर धान आणून ठेवत आहेत. ‘अ’ प्रतीच्या धानाला १७७० रूपये व ‘क’ प्रतीच्या धानाला १७५० रूपये भाव दिला जात आहे. धानोरा तालुक्यात आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्था धानोरा, मुरूमगाव, रांगी, दुधमाळा व कारवाफा येथे धान खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. मात्र सोडे, मोहली, पेंढरी, गट्टा, सुरसुंडी, सावरगाव, येरकड येथील धान खरेदी केंद्र अजूनही सुरू झाले नाही. त्यामुळे या भागातील शेतकºयांना खासगी व्यापाºयांना धान विकावे लागत आहे.धानोरा येथील धान खरेदी केंद्राला भेट दिली असता, खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून असल्याचे दिसून येत आहे. बारदाना नसल्याने काही शेतकºयांचे धान खरेदी करण्यास अडचण निर्माण होत आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसानेही हजेरी लावली आहे. पावसाने धान भिजू नये, यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:ची ताडपत्री झाकून ठेवली आहे.यावर्षी धानोरा केंद्रावर फक्त पाच हजार बारदाना उपलब्ध करून देण्यात आला होता. हा बारदाना काही दिवसांतच संपला. तेव्हापासून ज्या शेतकऱ्यांनी स्वत:चा बारदाना आणला आहे, अशाच शेतकºयांचे धान खरेदी केले जात आहे.बाजारात एका बारदान्याची किंमत २० ते २५ रूपये आहे. मात्र शासन केवळ १५ रूपये देत आहे. त्यातही प्रती बारदाना १० रूपये नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. धानोरा तालुक्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे.९ हजार क्विंटल खरेदीतालुक्यातील पाचही केंद्रांवर ९ हजार २०७ क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. मात्र एकाही शेतकऱ्याला धानाचे चुकारे देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खरेदी केंद्रावर वेळेवर चुकारा होत नसल्याने काही धानोरा तालुक्यातील शेतकरी खासगी व्यापाºयांना धान विकत असल्याचे दिसून येत आहे.धानोरा तालुक्यातील धान खरेदी केंद्रांकरिता एक लाख बारदान्याची मागणी केली आहे. दोन ते तीन दिवसांत बारदाना उपलब्ध होईल. तसेच बारदान्यासाठी पाच रूपये वाढीचा प्रस्ताव पाठविला आहे. आॅनलाईनची कामे पूर्ण झाले नसल्याने शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे देण्यास उशीर होत आहे. ते लवकर देण्यात येतील.- डी.एस.चौधरी, उपव्यवस्थापक, उपप्रादेशिक कार्यालय, धानोरा

टॅग्स :Farmerशेतकरी