शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१२ टक्क्यांनी धान खरेदी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धानाचे उत्पादन कमी झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाला. तसेच विविध प्रकारच्या रोगाचा धानपिकावर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती ५० ते ६० टक्केच उत्पादन आले. याचा परिणाम आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ...

ठळक मुद्देउत्पादन कमी झाल्याचा परिणाम : अत्यल्प पर्जन्यमान, कीड रोगाच्या प्रादुर्भावाने आवक कमी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धानाचे उत्पादन कमी झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाला. तसेच विविध प्रकारच्या रोगाचा धानपिकावर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती ५० ते ६० टक्केच उत्पादन आले. याचा परिणाम आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा याच तारखेत तब्बल १२.४० टक्क्यांनी महामंडळाची धान खरेदी घटली आहे.खरीप पणन हंगाम २०१६-१७ मध्ये आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत १६ जानेवारी २०१७ अखेर जिल्हाभरात सर्व केंद्रांवर मिळून ३ लाख ७४ हजार ६९ क्विंटल धानाची खरेदी झाली होती. यंदा याच तारखेला याच योजनेअंतर्गत ३ लाख ३२ हजार ७९९ क्विंटल इतकी खरेदी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४१ हजार २७० क्विंटलने धान खरेदी घटली आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोलीच्या प्रादेशिक कार्यालयामार्फत यंदाच्या खरीप पणन हंगामात ५३ धान खरेदी केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली. सर्वच खरेदी केंद्र सुरू झाले असून आतापर्यंत ५२ केंद्रावर धानाची आवक झाली आहे. १६ जानेवारी अखेरपर्यंत ५२ केंद्रावर ४० कोटी १९ लाख ७४ हजार ६९० रूपये किंमतीच्या २ लाख ५९ हजार ३३८ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. अहेरी कार्यालयाअंतर्गत ३४ केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून ३१ केंद्र सुरू झाले आहेत. यापैकी २९ केंद्रावर धानाची आवक झाली असून आतापर्यंत ११ कोटी ३८ लाख ६५ हजार २६३ रूपये किंमतीच्या ७३ हजार ४६१ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गतवर्षी १६ जानेवारी २०१७ अखेरपर्यंत ३ लाख ७४ हजार ६९ क्विंटल धानाची खरेदी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४१ हजार २७० क्विंटल इतकी धान खरेदी घटली आहे. धान खरेदी घटीची टक्केवारी १२.४० आहे.कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत गोठणगाव, नान्ही, कुरखेडा, सोन्सरी, खरकाडा, आंधळी, कढोली, गेवर्धा, पलसगड व शिरपूर या १० धान खरेदी केंद्रावर १६ जानेवारी अखेरपर्यंत ९ कोटी ८६ लाख १ हजार ९९४ रूपये किंमतीच्या एकूण ६३ हजार ६१४ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. कोरची उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत रामगड, येंगलखेडा, मालेवाडा, पुराडा, खेडेगाव, कोरची, बेतकाठी, बोरी, मरकेकसा, कोटरा, गॅरापत्ती, बेडगाव, मसेली या १३ धान खरेदी केंद्रावर ११ कोटी ५ लाख ७८ हजार ३८ रूपये किंमतीच्या ७१ हजार ३४० क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे.आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत अंगारा, उराडी, देलनवाडी, दवंडी, कुरंडीमाल, पोटेगाव, चांदाळा, मौशीखांब, पिंपळगाव, विहिरगाव आदी १० धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत ७ कोटी २८ हजार २५६ रूपये किंमतीच्या ४५ हजार १७९ क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे.धानोरा उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मुरूमगाव, धानोरा, रांगी, सुरसुंडी, सोडे, गट्टा, दुधमाळा, मोहली, पेंढरी, कारवाफा या १० धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत ५ कोटी ८५ लाख ५८ हजार ११६ रूपये किंमतीच्या एकूण ३७ हजार ७७९ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.घोट उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत रेगडी, मक्केपल्ली, भाडभिडी (बी.), गुंडापल्ली, आमगाव, मार्र्कं डा, गिलगाव, अड्याळ, सोनापूर व घोट आदी १० धान खरेदी केंद्रावर ६ कोटी ४२ लाख ८ हजार २८५ रूपये किंमतीच्या एकूण ४१ हजार ४२४ क्विंटलची धान खरेदी झाली आहे. यावर्षी धान खरेदीत घट आली आहे.२२ कोटींचे धान चुकारे प्रलंबितआदिवासी विकास महामंडळाने गेल्या दोन वर्षांपासून आॅनलाईन धान चुकाऱ्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागू नये, तसेच त्यांना लवकर चुकाऱ्याची रक्कम प्राप्त व्हावी, याकरिता आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात चुकाऱ्याची रक्कम अदा केली जाते. मात्र यंदाच्या खरीप हंगामातील ५ हजार ६६५ शेतकऱ्यांचे २२ कोटी ८१ लाख ९६ हजार ३४७ रूपयांचे धान चुकारे प्रलंबित आहेत. परिणामी धानाची विक्री करूनही संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. महामंडळ व आविका संस्थेने लगबगीने कार्यवाही करून प्रलंबित धान चुकारे तत्काळ अदा करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी