शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

शासकीय कार्यालयातच उरले लॅन्डलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:29 IST

एकेकाळी गावात संपर्काचे अत्यंत महत्त्वाचे साधन असलेल्या लॅन्डलाईला (दूरध्वनी) मोबाईलमुळे उतरती कळा लागली असून लॅन्डलाईन आता केवळ शासकीय कार्यालयापुरत्याच सिमित राहिल्या आहेत.

ठळक मुद्देमोबाईलचा परिणाम : केवळ ४ हजार २४८ जोडण्या शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकेकाळी गावात संपर्काचे अत्यंत महत्त्वाचे साधन असलेल्या लॅन्डलाईला (दूरध्वनी) मोबाईलमुळे उतरती कळा लागली असून लॅन्डलाईन आता केवळ शासकीय कार्यालयापुरत्याच सिमित राहिल्या आहेत. जिल्हाभरात सुमारे १७ हजार २४८ दूरध्वनीसेवा पुरविण्याची क्षमता आहे. मात्र केवळ आता ४ हजार ४४३ दूरध्वनी कनेक्शन शिल्लक राहिले आहेत.मोबाईलचा शोध लागण्यापूर्वी लॅन्डलाईन हेच संपर्काचे महत्त्व साधन होते. त्यामुळे शहराबरोबरच गावखेड्यातही दूरध्वनी संच खरेदी केला जात होता. गावातील काही निवडक नागरिकांकडे दूरध्वनी सेवा राहत होती. त्या दूरध्वनीवर गावातील अर्ध्या नागरिकांच्या नातेवाईकांचे फोन येत होते. दूरध्वनीचे महत्त्व लक्षात घेऊन बहुतांश व्यक्तींनी दूरध्वनी जोडणी घेतली होती. मात्र १० वर्षांपूर्वी मोबाईलचा शोध लागला. मोबाईलचा विस्तार प्रत्येक गावापर्यंत व घरापर्यंत झाला. बीएसएनएलसह खासगी कंपन्यांनी ग्रामीण भागात टॉवर उभारून सेवा उपलब्ध करून दिली.दूरध्वनीच्या तुलनेत मोबाईलचा वापर करणे सहज शक्य होते. मोबाईल हे उपकरण खिशामध्ये राहत असल्याने संबंधित व्यक्तीला कधीही संपर्क साधता येते. मोबाईल सेवा देण्यात अनेक खासगी कंपन्या उतरल्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होऊन अत्यंत कमी दरात मोबाईल सेवा उपलब्ध होत आहे. परिणामी नागरिकांनी दूरध्वनी सेवेकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यांच्याकडे दूरध्वनीसेवा होती, त्यांनी सुद्धा आता ही सेवा बंद केली आहे.शासकीय कार्यालयांमध्ये तसेच ज्या व्यक्ती वा संस्थेला ब्रॉडबँडची गरज आहे, अशा व्यक्तीला व संस्थेला लॅन्डलाईनचा क्रमांक, केबल घेणे आवश्यक असल्याने संबंधित कार्यालयात दूरध्वनीसेवा आढळून येते. घरामधून मात्र दूरध्वनी संच जवळपास गायबच झाला असल्याचे दिसून येते.बीएसएनएलने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात १७ हजार २४८ कनेक्शन घेऊ शकतात, एवढी क्षमता आहे. मात्र त्यापैकी केवळ ४ हजार २४३ कनेक्शन आहेत. त्याचबरोबर ३ हजार १८६ ब्रॉन्डबँड सर्व्हिस कनेक्शनची क्षमता आहे. मात्र केवळ २ हजार २४२ नागरिकांकडे ब्रॉडबँड सर्व्हिस आहे.ओएफसीमुळे ब्रॉडबँडही धोक्यातदिवसेंदिवस इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे. दूरसंचार सेवेतील ओएफसी केबल हा नवीन शोध आहे. आॅप्टिकल फायबर केबलमुळे (ओएफसी) इंटरनेटची स्पिड १५ ते २० पट अधिक राहते. त्यामुळे शासकीय कार्यालये, संस्था ओएफसी केबलला अधिक पसंती देत आहेत. यासाठी बीएसएनएलने कंत्राटदार नेमून सेवा देण्यास सुरुवात केली आहे. ज्या कार्यालयामध्ये इंटरनेचा वापर अधिक आहे, अशा कार्यालयांमध्ये ब्रॉडबँडची जागा आता ओएफसी केबल घेत आहे. ओएफसी केबलबरोबरच नवीन दूरध्वनी क्रमांक दिला जात आहे. त्यामुळे पीनकोड असलेले जुने दूरध्वनी क्रमांक व ब्रॉडबँडसुद्धा धोक्यात आले आहे.