अंतिम टप्प्यातील धान पिकावर रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:00:47+5:30
देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचा पाणीपुरवठा होतो. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे धरणाचा पाणीपुरवठा उन्हाळी हंगामासाठी करण्यात आला. यावर्षी तुळशी येथे जवळपास आठशे एकर शेतीमध्येमध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. सध्या उन्हाळी धान हंगाम अंतिम टप्यात आले आहे.

अंतिम टप्प्यातील धान पिकावर रोगांचा प्रादुर्भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळशी : देसाईगंज तालुक्यातील तुळशी परिसरातील धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे धानाच्या उत्पादनात बरीच घट येण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने उपाययोजना सूचवाव्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचा पाणीपुरवठा होतो. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे धरणाचा पाणीपुरवठा उन्हाळी हंगामासाठी करण्यात आला. यावर्षी तुळशी येथे जवळपास आठशे एकर शेतीमध्येमध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. सध्या उन्हाळी धान हंगाम अंतिम टप्यात आले आहे. मात्र धानाचा निसवा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पांढरी लोंबीच दिसत असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात करपा, मानमोडी, खोडकिडा यासारख्या रोगांनी धान पिकाला ग्रासले. किडीला पोषक वातावरण तयार झाल्याने रोग आटोक्यात आला नाही.
शेतकºयांनी उन्हाळी धान हंगामासाठी आवश्यक प्रमाणात खर्च केला. परंतु आता धानाचा निसवा झाल्यानंतर पांढरी लोंबी (पेरवा) अधिक प्रमाणात दिसत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तुळशी येथील बहुतांश शेतकºयांचे धान पीक पांढºया लोंबीमुळे धोक्यात आले आहे. काही शेतकºयांचा लागवड खर्च भरुन निघणे कठिण झाले आहे.
पिकाचे सर्वेक्षण करा
रोगामुळे तुळशी येथील आनंदराव पंचभाई या शेतकऱ्याच्या शेतातील धान पिकाची पूर्णपणे तनस झाली आहे. पीक कापणी करण्यायोग्य राहिले नाही. त्यामुळे रोगग्रस्त धान पिकाचे संबंधित विभागाने सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई द्यावी ,अशी मागणी तुळशी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.