अपघातामुळे एक तास वाहतूक ठप्प
By Admin | Updated: August 30, 2016 01:14 IST2016-08-30T01:14:10+5:302016-08-30T01:14:10+5:30
आरमोरी मार्गावरील कठाणी नदीवर सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास महिंद्रा पीकअप व

अपघातामुळे एक तास वाहतूक ठप्प
कठाणी नदीवरील घटना : एक किलोमीटरपर्यंत लागली होती वाहनांची रांग
गडचिरोली : आरमोरी मार्गावरील कठाणी नदीवर सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास महिंद्रा पीकअप व ट्रकच्या धकडेमुळे झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास एक तास ठप्प पडली होती. त्यामुळे चारचाकी वाहने, एसटी, ट्रक, दुचाकी यांची एक किमी अंतरापर्यंत रांग लागली होती. कार्यालयाला उशिर होत असल्याने काही कर्मचाऱ्यांनी खरपुंडी मार्गे पुढील प्रवास केला. क्षतीग्रस्त वाहन बाजुला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या अपघातात गडचिरोली येथील हनुमान वॉर्डातील पीकअप वाहनचालक ज्ञानेश्वर गणपत टिकले हा युवक जागीच ठार झाला. (नगर प्रतिनिधी)
नदीत उडी घेतल्याने श्रीधर पोटे अपघतातून बचावला
४अडपल्ली येथील श्रीधर गजानन पोटे (३५) हा युवक गडचिरोली येथे कामानिमित्त गावावरून येत होता. दरम्यान कठाणी नदीपुलावर त्याच्या मागून महिंद्रा पीकअप वाहन येत होते. तर समोरून ट्रक त्याच्याच बाजुने येत होता. त्यामुळे ट्रक आपल्याला धडक देईल, असा अंदाज आल्यानंतर श्रीधरने समयसुचकता दाखवित सायकल सोडून नदीपात्रात उडी घेतली. त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच ट्रकने महिंद्रा पीकअप वाहनाला जबर धडक दिली व यामध्ये महिंद्रा पीकअप वाहनाचा चालक मृत्यूमुखी पडला. श्रीधरच्या या समयसुचकतेची पोलीस व उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. अपघातानंतर श्रीधर हा भयभीत झाला होता. तो कामावर न जाता घरी परतला.