शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

ओबीसी व आदिवासींना सरकारने बनवले लढाईतील कोंबडे- पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:35 PM

गडकरी आणि फडणविसांनी सत्तेत येण्याआधी पेसा कायदा रद्द करू असे सांगून ओबीसी समाजाला चुचकारले, पण पेसा कायद्यात कोणतीही सुधारणा केली नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही. सरकार ओबीसी आणि आदिवासींना लढाईतील कोंबडे बनवून एकमेकांविरूद्ध लढवत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचा मेळावा : संविधान संपवण्याचा डाव हाणून पाडण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडकरी आणि फडणविसांनी सत्तेत येण्याआधी पेसा कायदा रद्द करू असे सांगून ओबीसी समाजाला चुचकारले, पण पेसा कायद्यात कोणतीही सुधारणा केली नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही. सरकार ओबीसी आणि आदिवासींना लढाईतील कोंबडे बनवून एकमेकांविरूद्ध लढवत आहे. पण ही वेळ भांडायची नाही. शोषित, पीडित समाजातील माणूस मुख्य प्रवाहात आला पाहीजे हे संविधानाचे मूळ असताना सरकारला ते नको आहे, असे सांगत संविधान संपवण्याचा या सरकारचा डाव हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शेतकरी-शेतमजूर सेलचे अध्यक्ष, माजी खा.नाना पटोले यांनी केले.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पटोले बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तथा माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी होते. यावेळी मंचावर प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी सुरेश भोयर, प्रदेश सचिव रविंद्र दरेकर, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आ.आनंदराव गेडाम, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश ईटनकर, डॉ.नामदेव किरसान, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, युवक काँग्रेसचे पंकज गुड्डेवार, डॉ.नितीन कोडवते, पेंटाराम तलांडी आदींसह अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.यावेळी नाना पटोले म्हणाले, भाजप सरकार आल्यापासून राज्यात सतत दुष्काळ पडत आहे. हे सरकार अपशकुनी आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देत नाही पण सामान्य लोकांच्या खिशातून वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून वसुली केली जाते. गोरगरीबांची मुले शिकू नये म्हणून विविध अभ्यासक्रमांची भरमसाठ फी वाढ केली आहे. बहुजन नेत्यांना संपवण्याचे काम ब्राह्मणवादी विचारसरणी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी डॉ.उसेंडी यांनी भाजपवर टिका करताना स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे काय योगदान होते, ते तर आयत्या बिळात नागोबा झाले असे सांगितले. काँग्रेससोबत भाजपेतर पक्षांनी मिळून लढावे. सोबतच काँग्रेसच्या लोकांनी थोडे जमिनीवर येऊन काम करण्याची गरज आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. यावेळी इतरही नेत्यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे संचालन विनोद खोबे आणि प्रा.दौलत धुर्वे यांनी तर आभार प्रदर्शन नगरसेवक सतीश विधाते यांनी केले. मेळाव्याला किशोर वनमाळी, मनोहर पाटील पोरेटी, जयंत हरडे, संजय चरडुके, रवी शहा, मनिषा डोनारकर, राजू जिवानी, हरिश मोटवानी, संजय पंदीलवार, प्रभाकर तुलावी, प्रल्हाद खराटे, महेंद्र ब्राह्मणवाडे, अधिर इंगोले, वैभव कडस्कर, अमोल भडांगे, जीवन नाट, रहीम शेख, नेताजी गावतुरे, पी.टी.मसराम, पांडुरंग घोटेकर, सी.बी.आवळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.सुरजागड तारक तर मेडीगड्डा मारकयावेळी नाना पटोले यांनी जिल्ह्यातील लोहखनिजाची विपुलता पाहता सुरजागडच्या खाणींमध्ये जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद आहे. लोहखनिजाची वाहतूक इतर जिल्ह्यात न करता जिल्ह्यातच प्रक्रिया प्रकल्प तातडीने उभारावा अशी मागणी त्यांनी केली. मात्र तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेला मेडीगड्डा प्रकल्प जिल्हावासियांसाठी मारक असल्याने त्याला विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हाणी होत आहे. जंगलाची कटाई झाली, लोक विस्थापित झाले, पण पाण्याचा उपयोग या जिल्हावासियांना होणार नाही, याचा जाब नागरिकांनी विचारावा असे आवाहन त्यांनी केले.ज्येष्ठांचा सत्कार आणि जीआरची होळीयावेळी कार्यक्रमाला विशेष निमंत्रित असलेल्या जिल्ह्यातील वयोवृद्ध काँग्रेस नेत्यांचा नाना पटोले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यासाठी मंचावरील सर्व पदाधिकारी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्या ज्येष्ठ नेत्यांजवळ गेले. या कार्यक्रमानंतर ओबीसींवर अन्याय करणाऱ्या शासनाच्या जीआरची होळी करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.विविध संघटनांच्या वतीने सत्कारअखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शेतकरी-शेतमजूर सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच गडचिरोलीत आल्याबद्दल नाना पटोले यांचा जिल्हा काँग्रेस कमिटी, जिल्हा महिला काँग्रेस कमिटी तसेच विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.