शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

आता राजकीय पक्षांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:37 IST

ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची महत्त्वाची पायरी म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच गावाची सत्ता आपल्याच हातात यावी किंवा आपल्या ...

ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची महत्त्वाची पायरी म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच गावाची सत्ता आपल्याच हातात यावी किंवा आपल्या गटाची सत्ता असावी, अशी इच्छा गावातील अनेक प्रमुख लोकांची असते. त्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका या पक्षविरहीत लढविल्या जातात. अनेक गावात प्रमुख्याने दोन तीन गट हे नेहमीसाठी असतात. याच गटाच्या आधारावर लोकसभा, विधानसभापासून तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपापल्या गटाचा आधार घेऊन लढविल्या जातात. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी गावागावात राहतात. याच कार्यकर्त्यांच्या भरवशावर राजकीय पक्ष निवडणुका लढवित असतात. मात्र, इतर निवडणुकीत फारसे प्रभावी न दिसणारे गावातील गट मात्र, ग्रामपंचायत निवडणुका आल्या की, एकमेकाविरोधात कट्टर बनतात. गावातील गटबाजी उफाळून येते.

राजकीय पक्षापेक्षा गावातील गट हे पक्षविरहीत एकमेका विरोधात उभे राहतात जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या जाहीर झालेल्या निकालात यावेळी नवख्या तरुण उमेदवारांना मतदारांनी पसंती देऊन त्यांना ग्रामपंचायतमध्ये काम करण्याची मोठी संधी दिली आहे. त्यामुळे गावाच्या कारभाराची धुरा नवख्या उमेदवारांवर येऊन ठेपली आहे. तर जुन्या लोकांना माेठ्याप्रमाणात लोकांनी नाकारले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत बऱ्याचशा ग्रामपंचायतमध्ये पक्षविरहीत निवडणुका झाल्या. गावागावात दोन ते तीन पॅनल एकमेकविरोधात उभे ठाकले होते. गावखेड्यात बऱ्याच गावात एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे एकमेकांसोबत पटत नसल्याने स्वतःचे पॅनल काढून एकमेकविरोधात लढले तर काही गावात विरोधी पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊन निवडणूक लढले. अशाप्रकारे अनेक गमतीजमती असलेल्या निवडणुका झाल्या. आता निवडणुकीची मतमोजणी आटोपल्याने गावागावातील वातावरण थोडे-थोडे शांत झाले आहे. काही गावात पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले तर काही गावात वेगवेगळ्या पॅनलचे सदस्य निवडून आल्याने संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे. सरपंचाच्या आरक्षणाची सोडत निघाल्यावर सत्तास्थापनेसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. ज्या गावात एखाद्या पॅनलला बहुमत मिळाले, त्या ठिकाणी परिस्थिती पाहिजे त्या प्रमाणात कठीण होणार नाही. मात्र वेगळ्या वेगळ्या पॅनलचे जे सदस्य म्हणून निवडून आले, त्या ठिकाणी मात्र मोठी रस्सीखेच होणार आहे, हे निश्चित.

अनेक प्रमुख पक्षांनी एकाच ग्रामपंचायतवर आपला दावा करीत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय पक्षामध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

आता सरपंच पदाचे आरक्षण निघेपर्यंत आणि सत्ता स्थापणेपर्यंत हा खेळ असाच चालणार असून ग्रामपंचायतवर आपल्या पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्याचा मानस व चढाओढ राजकीय पक्षांना लागली आहे.