शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

आता राजकीय पक्षांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:37 IST

ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची महत्त्वाची पायरी म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच गावाची सत्ता आपल्याच हातात यावी किंवा आपल्या ...

ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची महत्त्वाची पायरी म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच गावाची सत्ता आपल्याच हातात यावी किंवा आपल्या गटाची सत्ता असावी, अशी इच्छा गावातील अनेक प्रमुख लोकांची असते. त्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका या पक्षविरहीत लढविल्या जातात. अनेक गावात प्रमुख्याने दोन तीन गट हे नेहमीसाठी असतात. याच गटाच्या आधारावर लोकसभा, विधानसभापासून तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपापल्या गटाचा आधार घेऊन लढविल्या जातात. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी गावागावात राहतात. याच कार्यकर्त्यांच्या भरवशावर राजकीय पक्ष निवडणुका लढवित असतात. मात्र, इतर निवडणुकीत फारसे प्रभावी न दिसणारे गावातील गट मात्र, ग्रामपंचायत निवडणुका आल्या की, एकमेकाविरोधात कट्टर बनतात. गावातील गटबाजी उफाळून येते.

राजकीय पक्षापेक्षा गावातील गट हे पक्षविरहीत एकमेका विरोधात उभे राहतात जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या जाहीर झालेल्या निकालात यावेळी नवख्या तरुण उमेदवारांना मतदारांनी पसंती देऊन त्यांना ग्रामपंचायतमध्ये काम करण्याची मोठी संधी दिली आहे. त्यामुळे गावाच्या कारभाराची धुरा नवख्या उमेदवारांवर येऊन ठेपली आहे. तर जुन्या लोकांना माेठ्याप्रमाणात लोकांनी नाकारले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत बऱ्याचशा ग्रामपंचायतमध्ये पक्षविरहीत निवडणुका झाल्या. गावागावात दोन ते तीन पॅनल एकमेकविरोधात उभे ठाकले होते. गावखेड्यात बऱ्याच गावात एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे एकमेकांसोबत पटत नसल्याने स्वतःचे पॅनल काढून एकमेकविरोधात लढले तर काही गावात विरोधी पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊन निवडणूक लढले. अशाप्रकारे अनेक गमतीजमती असलेल्या निवडणुका झाल्या. आता निवडणुकीची मतमोजणी आटोपल्याने गावागावातील वातावरण थोडे-थोडे शांत झाले आहे. काही गावात पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले तर काही गावात वेगवेगळ्या पॅनलचे सदस्य निवडून आल्याने संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे. सरपंचाच्या आरक्षणाची सोडत निघाल्यावर सत्तास्थापनेसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. ज्या गावात एखाद्या पॅनलला बहुमत मिळाले, त्या ठिकाणी परिस्थिती पाहिजे त्या प्रमाणात कठीण होणार नाही. मात्र वेगळ्या वेगळ्या पॅनलचे जे सदस्य म्हणून निवडून आले, त्या ठिकाणी मात्र मोठी रस्सीखेच होणार आहे, हे निश्चित.

अनेक प्रमुख पक्षांनी एकाच ग्रामपंचायतवर आपला दावा करीत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय पक्षामध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

आता सरपंच पदाचे आरक्षण निघेपर्यंत आणि सत्ता स्थापणेपर्यंत हा खेळ असाच चालणार असून ग्रामपंचायतवर आपल्या पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्याचा मानस व चढाओढ राजकीय पक्षांना लागली आहे.