शेतीकामांसाठी आता मजूरच मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:59 IST2021-01-08T05:59:00+5:302021-01-08T05:59:00+5:30

गडचिराेली जिल्ह्यात वनकायद्याच्या अडचणीमुळे माेठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत. परिणामी येथील शेती व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ...

No more labor for agriculture | शेतीकामांसाठी आता मजूरच मिळेनात

शेतीकामांसाठी आता मजूरच मिळेनात

गडचिराेली जिल्ह्यात वनकायद्याच्या अडचणीमुळे माेठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत. परिणामी येथील शेती व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यात मजुरांच्या मजुरीच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामानाने उत्पादन हाेत नसून शासनाकडून हमीभावही मिळत नाही. शेती लागवडीचा खर्चही भरून निघत नसल्याने अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्यात सापडत आहेत.

बी-बियाणे, कीटकनाशके आदींच्या दरात वाढ झाली आहे. शिवाय गेल्या पाच वर्षांत पुरुष मजुराच्या मजुरीच्या दरामध्ये १३० रुपये तर महिला मजुराच्या मजुरीच्या दरामध्ये ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्या मानाने शासनाकडून धानाच्या भावात वाढ केली जात नाही. घरची शेती असणारे अनेक युवक पानठेला, कुक्कुटपालन व इतर छाेटे-माेठे व्यवसाय आणि खासगी नाेकरी करून जीवन जगत आहेत.

बाॅक्स...

शेती व्यवसाय झाला जाेखीम व दगदगीचा

- १० ते १५ वर्षांपूर्वी शेती व्यवसायात मजूर माेठ्या संख्येने मिळत हाेते. पूर्वी आवडीने शेती व्यवसाय केला जात हाेता. मात्र, आता शेती व्यवसाय जाेखीम व दगदगीचा झाला आहे. शेतीकामासाठी सहजासहजी मजूर मिळत नसल्याचे घारगाव येथील शेतकरी याेगेश आभारे यांनी सांगितले आहे.

- गडचिराेली तालुक्यासह जिल्ह्यात सिंचन सुविधा पाहिजे त्या प्रमाणात निर्माण झाल्या नाही. परिणामी कधी ओला तर कधी काेरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांना माेठे नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीमुळे आजची पिढी फारसा शेती व्यवसाय करण्यास तयार हाेत नाही, असे नगरी येथील शेतकरी महेश वाघरे यांनी सांगितले.

- शेती व्यवसायाला बकरी पालन, कुक्कुटपालन व इतर जाेडधंद्यांची साथ दिल्यास शेतकऱ्यांची प्रगती हाेऊ शकते. केवळ धानपिकाच्या शेतीवर काेणताही शेतकरी प्रगती साधू शकत नाही. आधीच गडचिराेली जिल्ह्यातील शेती व्यवसाय हंगामी स्वरूपाचा आहे. शासनाने शेतकऱ्यांना विशेष सूट देऊन राेहयाेअंतर्गत शेतीची कामे करावी, अशी मागणी माेहझरी येथील शेतकरी श्रावण महामंडरे यांनी केली.

बाॅक्स...

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा

कृषी क्षेत्रात गेल्या चार-पाच वर्षांपासून यंत्राचा वापर प्रचंड वाढला आहे. शासन व प्रशासकीय स्तरावरून जनजागृती झाल्याने तसेच मजुरांची वानवा असल्याने बहुतांश कामे यंत्राद्वारे शेतकरी करत आहे. धान व इतर पिकांतील तण/कचरा काढणे, खत टाकणे, पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणे, निंदण करणे आदी कामे मजुरांमार्फतच केली जात आहेत. मात्र, नांगरणी, चिखलणीपासून मळणीपर्यंतची कामे यंत्राद्वारे हाेत आहे.

बाॅक्स..

यंत्राने होणारी कामे

यंत्राद्वारे शेतातील नांगरणी, चिखलणी, पेरणी, कापणी, मळणी आदी कामे गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहेत.

Web Title: No more labor for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.