शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नत्र व स्फुरदचे प्रमाण घटतेय!

By admin | Updated: August 1, 2015 01:13 IST

सेंद्रिय खताऐवजी रासायनिक खतांचा वाढत चाललेला वापर तसेच जास्तीची घेतली जाणारी पिके यामुळे दिवसेंदिवस जमिनीतील नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी होत...

लोकमत विशेष

भविष्यात धोक्याची घंटा : मृद चाचणीतील अहवाल; सेंद्रिय खताचा वापर घटल्याचा परिणामदिगांबर जवादे गडचिरोलीसेंद्रिय खताऐवजी रासायनिक खतांचा वाढत चाललेला वापर तसेच जास्तीची घेतली जाणारी पिके यामुळे दिवसेंदिवस जमिनीतील नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी होत चालले असून भविष्यात शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचे मृद तपासणीतून दिसून आले आहे. माती परीक्षण मशीन वर्षभरापासून बंदझिंक, तांबे, लोह, मंगल, कॅल्शीअम कार्बोनेट, सोडियम आदी सुक्ष्म घटक द्रव्यांची तपासणी मशीनच्या माध्यमातून करण्यात येते. मात्र ही मशीन मागील वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे येथील सुक्ष्म द्रव्यांचे परीक्षण चंद्रपूर येथील प्रयोगशाळेत पाठवून केले जात आहे. सुक्ष्म द्रव्यांची तपासणी करण्यासाठी एप्रिल महिन्यापासून २ हजार ५४९ नमुने जिल्हा मृद तपासणी प्रयोगशाळेला प्राप्त झाले आहेत. मात्र यातील एकाही नमुन्यांची आजपर्यंत तपासणी करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नत्र व स्फुरदचे प्रमाण वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा. घटत चालले नत्र व स्फुरदचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यसाठी धोक्याचे आहे. शेतकऱ्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. सुक्ष्म द्रव्यांचे माती परीक्षण करणाऱ्या मशीनची दुरूस्ती करण्यात यावी. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र अजुनपर्यंत मशीन दुरूस्त करणारे तांत्रिक कर्मचारी उपलब्ध झाले नाही. - ए. एम. तलवाडे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारीझिंक व लोहाचे प्रमाण कमीजिल्ह्यातील जमिनीमध्ये नत्र व स्फुरद यांच्या बरोबरच झिंक व लोहाचे प्रमाण कमी असल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना झिंक व फेरस सल्फेटचे वितरण करण्यात येत आहे. सुक्ष्म द्रव्यांमध्ये तांबे, मंगल, कॅल्शीअम कार्बोनेट व सोडीयमचे प्रमाण सर्वसाधारण असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर सामू, क्षारता, सेंद्रिय कार्बन, पालाश यांचेही प्रमाण सर्वसाधारण असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात आम्लाचे प्रमाण आढळून आले आहे. त्या शेतकऱ्यांना चूना किंवा चूनखडीचा वापर करण्याची शिफारस प्रयोग शाळेच्या मार्फतीने करण्यात आली आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरजप्रत्येक शेतकऱ्याला स्वत:च्या जमिनीमध्ये कोणते घटकद्रव्ये आहेत, याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीचे माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. कृषी विभागाच्या मार्फतीने माती परीक्षण करून दिले जाते. मात्र त्याचे प्रमाण मर्यादित आहे. शेतकऱ्याने स्वत: माती परीक्षण करून घेतले तर त्यासाठी केवळ २७५ एवढे शुल्क आकारले जाते. तपासणी नंतर होणारे फायदे लक्षात घेता तपासणीचा खर्च नगण्य आहे. शेतकऱ्यांना जी आरोग्य पत्रिका देण्यात येते, त्यामध्ये काही सूचना दिलेल्या असतात. त्या सूचना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य पध्दतीने शेतकऱ्यांना समजावून देणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र असे होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक अनावश्यक कागद बनते.