शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नत्र व स्फुरदचे प्रमाण घटतेय!

By admin | Updated: August 1, 2015 01:13 IST

सेंद्रिय खताऐवजी रासायनिक खतांचा वाढत चाललेला वापर तसेच जास्तीची घेतली जाणारी पिके यामुळे दिवसेंदिवस जमिनीतील नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी होत...

लोकमत विशेष

भविष्यात धोक्याची घंटा : मृद चाचणीतील अहवाल; सेंद्रिय खताचा वापर घटल्याचा परिणामदिगांबर जवादे गडचिरोलीसेंद्रिय खताऐवजी रासायनिक खतांचा वाढत चाललेला वापर तसेच जास्तीची घेतली जाणारी पिके यामुळे दिवसेंदिवस जमिनीतील नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी होत चालले असून भविष्यात शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचे मृद तपासणीतून दिसून आले आहे. माती परीक्षण मशीन वर्षभरापासून बंदझिंक, तांबे, लोह, मंगल, कॅल्शीअम कार्बोनेट, सोडियम आदी सुक्ष्म घटक द्रव्यांची तपासणी मशीनच्या माध्यमातून करण्यात येते. मात्र ही मशीन मागील वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे येथील सुक्ष्म द्रव्यांचे परीक्षण चंद्रपूर येथील प्रयोगशाळेत पाठवून केले जात आहे. सुक्ष्म द्रव्यांची तपासणी करण्यासाठी एप्रिल महिन्यापासून २ हजार ५४९ नमुने जिल्हा मृद तपासणी प्रयोगशाळेला प्राप्त झाले आहेत. मात्र यातील एकाही नमुन्यांची आजपर्यंत तपासणी करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नत्र व स्फुरदचे प्रमाण वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा. घटत चालले नत्र व स्फुरदचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यसाठी धोक्याचे आहे. शेतकऱ्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. सुक्ष्म द्रव्यांचे माती परीक्षण करणाऱ्या मशीनची दुरूस्ती करण्यात यावी. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र अजुनपर्यंत मशीन दुरूस्त करणारे तांत्रिक कर्मचारी उपलब्ध झाले नाही. - ए. एम. तलवाडे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारीझिंक व लोहाचे प्रमाण कमीजिल्ह्यातील जमिनीमध्ये नत्र व स्फुरद यांच्या बरोबरच झिंक व लोहाचे प्रमाण कमी असल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना झिंक व फेरस सल्फेटचे वितरण करण्यात येत आहे. सुक्ष्म द्रव्यांमध्ये तांबे, मंगल, कॅल्शीअम कार्बोनेट व सोडीयमचे प्रमाण सर्वसाधारण असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर सामू, क्षारता, सेंद्रिय कार्बन, पालाश यांचेही प्रमाण सर्वसाधारण असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात आम्लाचे प्रमाण आढळून आले आहे. त्या शेतकऱ्यांना चूना किंवा चूनखडीचा वापर करण्याची शिफारस प्रयोग शाळेच्या मार्फतीने करण्यात आली आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरजप्रत्येक शेतकऱ्याला स्वत:च्या जमिनीमध्ये कोणते घटकद्रव्ये आहेत, याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीचे माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. कृषी विभागाच्या मार्फतीने माती परीक्षण करून दिले जाते. मात्र त्याचे प्रमाण मर्यादित आहे. शेतकऱ्याने स्वत: माती परीक्षण करून घेतले तर त्यासाठी केवळ २७५ एवढे शुल्क आकारले जाते. तपासणी नंतर होणारे फायदे लक्षात घेता तपासणीचा खर्च नगण्य आहे. शेतकऱ्यांना जी आरोग्य पत्रिका देण्यात येते, त्यामध्ये काही सूचना दिलेल्या असतात. त्या सूचना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य पध्दतीने शेतकऱ्यांना समजावून देणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र असे होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक अनावश्यक कागद बनते.