शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

आगीच्या घटनांमुळे पुंजण्यांची रात्री जागल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 00:15 IST

२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास कोरची येथील सिताबाई हिडामी यांच्या शेतातील धानाच्या पुंजन्याला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण पुंजने जळून खाक झाले. घटनास्थळी तहसीलदारांनी भेट देऊन हिडामी यांना मदत देण्याचे आश्वासन दिले. हिडामी यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशासनाने मदत देण्याची मागणी : कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची परिसरातील शेतकऱ्यांच्या धान पुंजण्यांना आगी लागत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी पुंजण्यांची रात्रीच्या सुमारास जागल करीत आहेत.२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास कोरची येथील सिताबाई हिडामी यांच्या शेतातील धानाच्या पुंजन्याला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण पुंजने जळून खाक झाले. घटनास्थळी तहसीलदारांनी भेट देऊन हिडामी यांना मदत देण्याचे आश्वासन दिले. हिडामी यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी कोरची येथून २० किमी अंतरावर असलेल्या चिचगड परिसरातील १०० धानाचे पुंजने जळाल्याची बातमी परिसरात पसरली होती. त्यानंतर कोरची येथील पुंजन्यांना गुरूवारी आग लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक कुटुंबासह रात्री शेतावर जाऊन जागल करीत आहेत. तालुक्यातील मसेली, बिहीटेकला, वडेगाव, कोरची, भिमपूर, सोहले येथील शेतकरी गस्त घालत आहेत.कसून शोध घेण्याची गरजधानाच्या पुंजन्याला आग लागल्यास शेतकऱ्याची संपूर्ण मेहनत वाया जाते. उलट तो कर्जबाजारी होते. यातून सावरण्यासाठी त्याला तीन ते चार वर्षांचा कालावधी लागते. घेतलेले कर्ज फेडणेही कठीण होते. बहुतांश वेळा पुंजन्यांना आगी एखाद्या व्यक्तीमार्फत लावल्या जातात. घटनेबाबतची तक्रार नागरिकांकडून पोलीस स्टेशनमध्ये झाल्यानंतर याचा तपास करून आरोपीला कठोर सजा होणे आवश्यक आहे. नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर अशा प्रकरणांचा कसून शोध घेऊन आरोपींना अटक करणे आवश्यक आहे.

टॅग्स :fireआगFarmerशेतकरी