शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अहेरीतील 'कोलामार्का'त हाेणार रान म्हशींचे संवर्धन; वन्यजीव मंडळामार्फत अभयारण्याचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 15:26 IST

कमलापूर वनपरिक्षेत्रात असलेले कोलामार्का हे महाराष्ट्रातील रानम्हशींसाठी एकमेव राखीव संवर्धन क्षेत्र आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग अंतर्गत असलेल्या अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रातील 'कोलामार्का' वन्यजीव अभयारण्याला राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हे राज्यातील ५१ वे अभयारण्य ठरले आहे. या ठिकाणी असलेल्या रानम्हशींचे संवर्धन हाेण्यास चालणा मिळणार आहे.

सिरोंचा वनविभाग राज्याच्या नकाशावर वन वैभवात भर टाकणारे म्हणून ओळखले जाते. येथे उच्च प्रतीचे सागवान मिळत असल्यामुळे या वनविभागाचे नावलौकिक झाले आहे. सध्या नामशेष होणाऱ्या रानम्हशी सिरोंचा वनविभागात आहेत. २०११ मध्ये 'नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लॅब' मध्ये कोलामार्का हे राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. त्यानुसार नोव्हेंबर २०१२ मध्ये ५ वर्षांचा नियोजन आराखडा तयार करून ८ जानेवारी २०१३ रोजी कोलामार्का हे राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केले गेले.

कमलापूर वनपरिक्षेत्रात असलेले कोलामार्का हे महाराष्ट्रातील रानम्हशींसाठी एकमेव राखीव संवर्धन क्षेत्र आहे. एकूण १०८.७२ किमीमध्ये हे विस्तारलेले आहे. २०१३ मध्ये याची घोषणा करण्यात आली होती. ९ वर्षांनंतर याला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. जगातील एकूण चार हजार रानम्हशींपैकी एकट्या भारतात सुमारे तीन हजार पाचशे रानम्हशी आहेत. कोलामार्का येथील रानम्हशी १८६० पासून म्हणजेच सुमारे १६२ वर्षांपूर्वीपासून येथे वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र आणि छत्तीसगड मिळून २०० रानम्हशी आहेत. त्यापैकी या भागात सुमारे २२ ते २५ रानम्हशींचा कळप आढळतो.

गडचिरोलीतील घनदाट जंगल आणि ऊत्तम वातावरण पुरेसे पाणी आणि खाद्य यामुळे हा अनमोल ठेवा कायम आहे. रानम्हशींचे आयुष्य साधारणत: २५ वर्षांचे असून दीर्घ प्रजनन काळ आहे. साधारणपणे तीन ते चार वर्षांत एका पिलाचा जन्म होतो. कमलापूर येथील हत्ती कॅम्पनंतर दुर्मिळ रानम्हशी हे गडचिरोली जिल्ह्याचे वनवैभव आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवaheri-acअहेरीforest departmentवनविभागforestजंगलgadchiroli-acगडचिरोली