शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अहेरीतील 'कोलामार्का'त हाेणार रान म्हशींचे संवर्धन; वन्यजीव मंडळामार्फत अभयारण्याचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 15:26 IST

कमलापूर वनपरिक्षेत्रात असलेले कोलामार्का हे महाराष्ट्रातील रानम्हशींसाठी एकमेव राखीव संवर्धन क्षेत्र आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग अंतर्गत असलेल्या अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रातील 'कोलामार्का' वन्यजीव अभयारण्याला राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हे राज्यातील ५१ वे अभयारण्य ठरले आहे. या ठिकाणी असलेल्या रानम्हशींचे संवर्धन हाेण्यास चालणा मिळणार आहे.

सिरोंचा वनविभाग राज्याच्या नकाशावर वन वैभवात भर टाकणारे म्हणून ओळखले जाते. येथे उच्च प्रतीचे सागवान मिळत असल्यामुळे या वनविभागाचे नावलौकिक झाले आहे. सध्या नामशेष होणाऱ्या रानम्हशी सिरोंचा वनविभागात आहेत. २०११ मध्ये 'नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लॅब' मध्ये कोलामार्का हे राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. त्यानुसार नोव्हेंबर २०१२ मध्ये ५ वर्षांचा नियोजन आराखडा तयार करून ८ जानेवारी २०१३ रोजी कोलामार्का हे राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केले गेले.

कमलापूर वनपरिक्षेत्रात असलेले कोलामार्का हे महाराष्ट्रातील रानम्हशींसाठी एकमेव राखीव संवर्धन क्षेत्र आहे. एकूण १०८.७२ किमीमध्ये हे विस्तारलेले आहे. २०१३ मध्ये याची घोषणा करण्यात आली होती. ९ वर्षांनंतर याला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. जगातील एकूण चार हजार रानम्हशींपैकी एकट्या भारतात सुमारे तीन हजार पाचशे रानम्हशी आहेत. कोलामार्का येथील रानम्हशी १८६० पासून म्हणजेच सुमारे १६२ वर्षांपूर्वीपासून येथे वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र आणि छत्तीसगड मिळून २०० रानम्हशी आहेत. त्यापैकी या भागात सुमारे २२ ते २५ रानम्हशींचा कळप आढळतो.

गडचिरोलीतील घनदाट जंगल आणि ऊत्तम वातावरण पुरेसे पाणी आणि खाद्य यामुळे हा अनमोल ठेवा कायम आहे. रानम्हशींचे आयुष्य साधारणत: २५ वर्षांचे असून दीर्घ प्रजनन काळ आहे. साधारणपणे तीन ते चार वर्षांत एका पिलाचा जन्म होतो. कमलापूर येथील हत्ती कॅम्पनंतर दुर्मिळ रानम्हशी हे गडचिरोली जिल्ह्याचे वनवैभव आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवaheri-acअहेरीforest departmentवनविभागforestजंगलgadchiroli-acगडचिरोली