शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

२५३ गावांना ‘नवसंजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 5:00 AM

पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये सर्वाधिक ७३ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. याशिवाय भामरागड तालुक्यातील ५९, अहेरी तालुक्यातील ५७, सिरोंचा तालुक्यातील २८, धानोरा तालुक्यातील ३२ तर मुलचेरा तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देपावसाळापूर्व नियोजन : ७० टक्के गावांमध्ये पोहोचले चार महिन्यांचे धान्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यातील २५३ गावांचा संपर्क तुटणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन करणे सुरू आहे. त्याअंतर्गत संबंधित गावातील नागरिकांसाठी नवसंजीवनी योजनेअंतर्गत चार महिन्यांच्या धान्य पुरवठ्याची सोय आधीच केली जात आहे. आतापर्यंत ७० टक्के गावांपर्यंत सदर धान्याचा पुरवठा झाला आहे.पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये सर्वाधिक ७३ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. याशिवाय भामरागड तालुक्यातील ५९, अहेरी तालुक्यातील ५७, सिरोंचा तालुक्यातील २८, धानोरा तालुक्यातील ३२ तर मुलचेरा तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे. या ६ तालुक्यातील १२७ रेशन दुकानांमार्फत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना गहू आणि तांदळाचा पुरवठा केला जातो. आतापर्यंत जवळपास ८० दुकानांमध्ये हे धान्य पोहोचल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.पावसाळ्यात अनेक नदी-नाले भरभरून वाहतात. त्या नाल्यांवर पूल नसल्यामुळे नाल्यातून मार्ग काढत पलिकडच्या गावांमध्ये पोहोचणे कठीण होते. चारचाकी वाहन तर दूर, दुचाकी वाहनही चालू शकत नाही. यामुळे त्या गावांचा संपर्क तुटतो. अशावेळी तेथील नागरिकांना रेशनचा गहू आणि तांदूळ मिळावा म्हणून नवसंजीवनी योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना निर्धारित नियतव्ययानुसार चार महिन्यांचे धान्य एकाचवेळी दिले जाते. पावसाळ्यातील ही दैनावस्था दूर होण्याची प्रतीक्षा त्यांना आहे.औषधीही पोहोचविणारधान्यासोबत नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास गावातच औषधी मिळावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये पुरेसा औषधीसाठा पुरविला जात आहे. अंगणवाड्यांमार्फत आहार पुरवठाही केला जात आहे.११ हजार क्विंटल धान्य पुरविणारअंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील तांदूळ मिळून एकूण २३६४ क्विंटल गहू आणि ८६९४ क्विंटल तांदूळ पुरवठा केला जाणार आहे. दोन्ही प्रकारचे धान्य मिळून ११ हजार ५८ क्विंटल धान्य पुरवठा होणार आहे. त्यापैकी ७० टक्के माल रेशन दुकानांपर्यंत पोहोचला आहे. पावसाळ्याला सुरूवात होण्याआधीच सर्व धान्यांचे वाटप लाभार्थ्यांना होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक