शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:32 AM

जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधित राहावे, त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने आरमोरी वन परिक्षेत्रातील वन क्षेत्रात ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे,.....

ठळक मुद्देखोदतळ्यात टंँकरद्वारे पाणीसाठा : वन विभागाकडून वन्यजीवांसाठी केली जात आहे सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधित राहावे, त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, वन्यजीवांना आपली तहान भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने आरमोरी वन परिक्षेत्रातील वन क्षेत्रात ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे, अशा ठिकाणी खोदतळ्यात व कोरडे पडलेल्या पाणवठ्यात वन विभागामार्फत टँकरद्वारे पाणीसाठा केला जात आहे.आरमोरी वन परिक्षेत्रातील अरसोडा, कासवी, रवी, वैरागड, डोंगरतमाशी व इतर वनक्षेत्रात साधारणपणे ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर आहे, त्या परिक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठ्यात तसेच स्वनिर्मित खोदतळ्यात आरमोरी वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी टँकरद्वारे पाणीसाठा करीत आहेत. वाढत्या तापमानात वन्यजीवांची यातून पाण्याची व्यवस्था होत आहे. जंगलात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने वन्यजीव तहाण भागविण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घेतात आणि त्याची शिकार केली जाते. हे टाळण्यासाठी आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जंगलात पाणी मिळत नसल्याने त्याच ठिकाणी वन्यजीवांचा तडफडून मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. असे असले तरी वनाधिकारी व कर्मचारी गॅस कनेक्शन वाटप करणे, तेंदू बोनसचे वाटप करणे व मानवीकृत रोपवाटीकांचे बोगस बिल पाठविण्यात व्यस्त आहे.आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वन्यजीवांना संजीवनी मिळत आहे. यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत नाही. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्ह्याच्या पाचही वन विभागात यंदा राबविण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यात सध्या उष्णतेचा पारा ४२ अंशावर पोहोचला आहे. नदी, नाले, तलाव, बोड्या, वनतलाव, खोदतळे पूर्णत: आटले असल्याने जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.आरमोरी वन परिक्षेत्रातील जे नैसर्गिक पाणवठे आहे, ते पूर्णत: कोरडे पडले आहे. दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असल्याने वन्यप्राण्यांनाही पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याशिवाय वन्यप्राण्यांचा जीव जाऊ नये, यासाठी ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्या ठिकाणच्या खोदतळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी सुविधा होत आहे.- एच. जी. बारसागडे,वन परिक्षेत्राधिकारी, आरमोरी

टॅग्स :forest departmentवनविभाग