मुंबईची लोकल सुरू, मग गडचिरोलीत का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST2021-02-05T08:52:51+5:302021-02-05T08:52:51+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २२ मार्चपासून देशात लाॅकडाऊन जाहीर केले. यात रेल्वे सेवाही बंद करण्यात ...

मुंबईची लोकल सुरू, मग गडचिरोलीत का नाही?
लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २२ मार्चपासून देशात लाॅकडाऊन जाहीर केले. यात रेल्वे सेवाही बंद करण्यात आल्या. काेराेनाचा प्रभाव ओसरताच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, देसाईगंजच्या वडसा रेल्वेस्थानकावरून धावणाऱ्या अनेक पॅसेंजर गाड्या अजूनही बंदच आहेत. एवढेच नाही तर या स्टेशनवरून धावणाऱ्या कोणत्याही सुपरफास्ट गाड्यांचा थांबा सुरू केला नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करीत रस्ते मार्गाने प्रवास करावा लागत आहे.
देसाईगंज येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे जिल्हाभरातील व नजीकच्या भंडारा जिल्ह्यातील नागरिक देसाईगंज येथूनच रेल्वेने पुढचा प्रवास करतात. वडसा-चांदाफाेर्ट, गाेंदिया- बल्लारशा, वडसा- नागभिड, चांदाफाेर्ट-गाेंदिया, बल्लारशा-गाेंदिया या रेल्वे देसाईगंज स्थानकावरून जातात. देसाईगंज रेल्वेस्थानकावरून दरदिवशी जवळपास १५०० प्रवासी ये-जा करतात. त्यात जवळपास ४०० पासधारक आहेत. दिवसाला जवळपास ४० हजार रुपयांचे उत्पन्न रेल्वेला उपलब्ध हाेत हाेते. याच मार्गावरून जसवंतपूर-काेरबा, सिकंदराबाद-दरभंगा या सुपरफास्ट रेल्वेही देसाईगंज रेल्वेस्थानकावर थांबत हाेत्या. लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर या सर्व सुपरफास्ट रेल्वे धावत आहेत. मात्र, देसाईगंज रेल्वेस्थानकावरील थांबा बंद करण्यात आला आहे. गया-चेन्नई ही रेल्वे नव्याने सुरू झाली आहे. दररविवारी ही रेल्वे देसाईगंजवरून जाते. मात्र, तिचाही थांबा ठेवण्यात आला नाही. काेराेनापूर्व काळापर्यंत या सर्व सुपरफास्ट एक्स्प्रेसचे थांबे देसाईगंज येथे असल्याने या ठिकाणावरून अनेक प्रवासी प्रवास करीत हाेते; परंतु आता थांबे रद्द केल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
सर्व सुरू झाले असताना पॅसेंजरच का बंद
लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देताना सर्व बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, उद्याेग, शहरी भागातील रेल्वे वाहतूक, बसगाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र, रेल्वे मंत्रालयाने पॅसेंजर सुरू करण्याबाबत काेणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे रेल्वेचे नुकसान हाेत आहे. साेबतच प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. पॅसेंजर सुरू करण्यात यावी, तसेच पूर्वीप्रमाणेच सुपरफास्ट गाड्यांचे बसथांबे देसाईगंज येथे देण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून हाेत आहे.
काेट
काेराेनाच्या पार्श्वभूमीवरच सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले असावेत. पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत काेणताही पत्रव्यवहार करण्यात आला नाही. रेल्वे मंत्रालयाकडून कोणत्याही सूचना नाहीत.
- संजीवकुमार, स्टेशन प्रमुख