स्टेट बँकेमुळे त्रस्त नागरिकांचे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:56+5:302021-01-08T05:58:56+5:30
एटापल्ली : येथील एसबीआयच्या नियाेजनशून्य कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिक व व्यापाऱ्यांनी गुरुवारी बॅंकेसमाेर धरणे आंदाेलन केले. एक महिन्याच्या आत ...

स्टेट बँकेमुळे त्रस्त नागरिकांचे आंदाेलन
एटापल्ली : येथील एसबीआयच्या नियाेजनशून्य कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिक व व्यापाऱ्यांनी गुरुवारी बॅंकेसमाेर धरणे आंदाेलन केले. एक महिन्याच्या आत समस्या साेडविण्याचे आश्वासन एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले.
एसबीआयमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग आहे. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर हाेत नाहीत. पुरेसा कर्मचारी वर्ग देण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी एटापल्ली येथील व्यापारी संघटनेने गुरुवारी बॅँकेला कुलूप ठाेकण्याचा इशारा दिला हाेता. व्यापारी व ग्राहक बँकेला कुलूप ठाेकण्यास गेले असता, एटापल्लीचे ठाणेदार शीतलकुमार डाेईझर यांनी मध्यस्थी घडवून आणली. त्यामुळे कुलूप ठाेकण्यात आले नाही. दुपारी १२ वाजता गडचिराेली येथून मुख्य व्यवस्थापक राधेश्याम प्रसाद, लीड बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक युवराज टेंभुर्णे, भंडारा येथून उपव्यवस्थापक आशिष फुले हे एटापल्ली येथे पाेहाेचले. त्यावेळी आंदाेलन सुरूच हाेते. आंदाेलकांनी एसबीआयच्या अधिकाऱ्यांसाेबत चर्चा केली. समस्या साेडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले. आंदाेलनाचे नेतृत्व महेश पुल्लूरवार, सचिन माेतकुरवार, सुरेश बारसागडे, संदीप शेलवटकर यांनी केले.
बाॅक्स
या समस्या साेडविण्याचे आश्वासन
एक महिन्याच्या आत सहायक व्यवस्थापक व एका लिपिकाचे पद भरले जाईल. बँकेत जनरेटरची व्यवस्था केली जाईल. इंटरनेटची स्पीड वाढावी, यासाठी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत चर्चा केल्या जाईल. तसेच इतर मागण्या बँकेच्या व्यवस्थापकांना कळवून त्या साेडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे लेखी आश्वासन एटापल्लीचे शाखा प्रबंधक व मुख्य व्यवस्थापक यांनी दिल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले.
===Photopath===
070121\07gad_1_07012021_30.jpg
===Caption===
बॅंकेसमाेर आंदाेलन करताना एटापल्ली येथील व्यापारी व ग्राहक.