शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

महाराष्ट्र धर्म दाखवून देण्याची वेळ आलीय; गडचिराेलीच्या मदतीसाठी राेहित पवार यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 10:54 IST

गडचिरोली जिल्ह्याला मदत करा’ असे आवाहन कर्जत - जामखेडचे आमदार राेहित पवार यांनी ट्वीटद्वारे केले आहे.

गडचिरोली : गेल्या सहा दिवसांपासून गडचिराेली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पूर परिस्थितीमुळे ‘गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सिरोंचा, भामरागड, अहेरी, एटापल्ली तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी साचले असून, घरांना पाण्याचा वेढा पडलाय. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून गडचिरोली जिल्ह्याला मदत करा’ असे आवाहन कर्जत - जामखेडचे आमदार राेहित पवार यांनी ट्वीटद्वारे केले आहे.

गोसेखुर्द, मेडीगड्डा, चिचडोहमधून विसर्ग सुरू असल्याने येणारे काही दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. प्राणहिता, गोदावरी, पर्लकोटा नद्यांनी संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले. गडचिरोली जिल्ह्यात एवढे मोठे संकट असल्याने राज्य सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अशा संकटात मदतीला धावून जाणं, हाच खरा महाराष्ट्र धर्म आहे. गेल्यावर्षी कोकण, प. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करून आपण सर्वांनीच महाराष्ट्र धर्म दाखवून दिला. आता गडचिरोलीसाठीही हाच महाराष्ट्र धर्म दाखवून देण्याची वेळ आलीय, असेही त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

१२ हजार नागरिकांचे स्थलांतर

सततचा पाऊस आणि जलाशयांमधील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील नागरिकांना सर्वाधिक फटका बसला. शुक्रवारी पूरस्थिती हळूहळू निवळत असल्याचे दिसून आले असले तरी पूरग्रस्त भागातील तब्बल ११ हजार ८३६ नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे. अजूनही अनेक घरांना पुराचा वेढा कायम आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्याचा दक्षिण भाग पुराने ग्रासला आहे. त्यातही सिरोंचा, अहेरी, भामरागड या तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.

मेडिगड्डा बॅरेजचे सर्व ८५ गेट उघडल्याने सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे गोदावरी नदीचे पाणी पात्र सोडून लगतच्या गावात, शेतात शिरले आहे. त्याचा फटका सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना बसला. याशिवाय प्राणहिता नदीचे पाणी सिरोंचा शहरात पसरले. त्यामुळे पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम तीन दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत सिरोंचा तालुक्यातील ३४ गावांमधील, अहेरी तालुक्यातील १३ गावांमधील तर मुलचेरा तालुक्यातील २ गावांमधील नागरिकांना हलविण्यात आले.

टॅग्स :SocialसामाजिकRohit Pawarरोहित पवारGadchiroliगडचिरोलीRainपाऊसfloodपूर