प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:37+5:30
मजुरी मिळते म्हणून स्वच्छतेचे काम केले जात असले तरी हे काम पाहिजे तेवढे सोपे नाही. गडचिरोली शहरात सकाळी ८ वाजेपासून स्वच्छतेच्या कामाला सुरूवात होते. नाली उपसणे, प्रत्येक घरी जाऊन घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करणे आदी कामे नियमितपणे सुरू आहेत. कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून स्वच्छता कर्मचाऱ्यांवरील जबाबदारी आणखी वाढली आहे.

प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छतेचा संदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वच्छता पाळण्याचे सल्ले अनेक जण देतात. मात्र सल्ले देणारेही कधीकधी स्वच्छतेचे नियम पाळत नसल्याचे दिसून येते. कर्मचारी मात्र प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छतेचा संदेश नागरिकांना देत आहेत. कोरोनाच्या दहशतीतही स्वच्छता कर्मचारी काम करीत आहेत.
मानवी आरोग्य चांगले राहण्यासाठी वैयक्तिक व परिसराची स्वच्छता असणे गरजेची आहे. कोरोनामुळे स्वच्छतेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. कोरोनामुळे संपूर्ण देश घरी बसून आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. या नियमाचे अनेक जण पालन करीत असल्याने शहरातील रस्ते ओस पडायला लागले आहेत. कोरोनाच्या या दहशतीतही स्वच्छता कर्मचारी मात्र आपले कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येते.
मजुरी मिळते म्हणून स्वच्छतेचे काम केले जात असले तरी हे काम पाहिजे तेवढे सोपे नाही. गडचिरोली शहरात सकाळी ८ वाजेपासून स्वच्छतेच्या कामाला सुरूवात होते. नाली उपसणे, प्रत्येक घरी जाऊन घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करणे आदी कामे नियमितपणे सुरू आहेत. कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून स्वच्छता कर्मचाऱ्यांवरील जबाबदारी आणखी वाढली आहे. स्वच्छतेचे काम करण्याबरोबरच सदर कर्मचारी भाजीपाला बाजारात सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करणे, भाजीपाला बाजारात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावण्यासाठी प्रवृत्त करणे आदी कामे केली जात आहेत.
स्वच्छतेचे महत्त्व ओळखून प्रत्येक शहरात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोनाविरोधात लढणाºया प्रशासकीय यंत्रणेसोबतच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्याही कामाचे मोल कमी नाही. त्यामुळे त्यांच्याही सेवेला सलाम ठोकण्याची गरज आहे.