मार्कंडात व्यापारी वर्ग दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:00:40+5:30
महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव येथे भरणारी जत्रा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात प्रसिध्द आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ही सर्वात मोठी जत्रा आहे. जत्रेच्या निमित्त लाखो भाविक मार्र्कंडादेव येथे येतात. १० दिवसांच्या जत्रेदरम्यान कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. जत्रेत खेळणे, भांडी, हळद-कुंकू यांच्यासह करमणुकीची विविध साधने राहतात.

मार्कंडात व्यापारी वर्ग दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मार्र्कंडादेव : महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव येथे १० दिवसांची जत्रा भरते. यावर्षी २१ फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. जत्रेनिमित्त करमणुकीची साधने राहतात. जत्रा १२ दिवसांवर येऊन ठेपली असल्याने करमणुकीची साधने मार्र्कंडादेव येथे दाखल झाली आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव येथे भरणारी जत्रा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात प्रसिध्द आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ही सर्वात मोठी जत्रा आहे. जत्रेच्या निमित्त लाखो भाविक मार्र्कंडादेव येथे येतात. १० दिवसांच्या जत्रेदरम्यान कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. जत्रेत खेळणे, भांडी, हळद-कुंकू यांच्यासह करमणुकीची विविध साधने राहतात. झुला, मौत का कुआ, सर्कस आदी करमणुकीच्या साधनांचा उपभोग घेण्याकडे यात्रेकरूंचा कल राहत असल्याने यातूनही बऱ्यापैकी कमाई होते. झुला, मौत का कुआ आदी साधने जत्रेपूर्वीच तयार ठेवावी लागतात. त्यांची फिटींग करण्यास बराच कालावधी लागत असल्याने जत्रा १२ दिवसांवर असतानाही साहित्य येऊन पडले आहेत. पावसामुळे साहित्य फिटींग करण्याची गती मंद आहे. ढगाळ वातावरण गेल्यानंतर फिटींगला गती येणार आहे. विशेष म्हणजे, तीळ संक्रांत ते महाशिवरात्री या कालावधीत दरवर्षी हमखास अवकाळी पाऊस पडते. यावर्षी महाशिवरात्रीच्या पूर्वीच पाऊस आला आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या कालावधीत वातावरण चांगले राहिल, अशी शक्यता आहे.
पाऊस आल्यास यात्रेकरू यात्रेसाठी जात नसल्याने यात्रेवर परिणाम पडते. त्यामुळे आर्थिक उलाढालही मंदावून दुकानदारांचे नुकसान होते.