कचऱ्याच्या रपट्यावर वसणार बाजार
By Admin | Updated: July 21, 2015 02:25 IST2015-07-21T02:25:23+5:302015-07-21T02:25:23+5:30
राजनगरी म्हणून ओळख असलेल्या अहेरी शहरात आठवडी बाजारासाठी जागेची समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.

कचऱ्याच्या रपट्यावर वसणार बाजार
एसडीओंचा पुढाकार : अहेरीतील बाजाराच्या जागेचा प्रश्न सुटणार; काम झाले सुरू
अहेरी : राजनगरी म्हणून ओळख असलेल्या अहेरी शहरात आठवडी बाजारासाठी जागेची समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. परंतु पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या पुढाकारातून शहरानजीकच्या तलाव परिसरात कचऱ्याच्या रपट्यावर आठवडी बाजार वसविला जाणार आहे. याकरिता शहरातील संपूर्ण कचरा तलाव ठिकाण असलेल्या जागेत टाकला जात आहे.
अहेरीत शनिवारच्या आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध नसल्याने भाजीपाला विक्रेते राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात आपली दुकाने थाटत होती. परिणामी वाहतुकीची कोंडी व किरकोळ अपघातात वाढ झाली होती. आठवडी बाजारासाठी तलावालगतची जागा समतल करण्यासाठी एसडीओंनी पुढाकार घेतला व मजुरांकरवी झुडुपांची कटाई केली. आठवडी बाजाराची समस्या सुटणार आहे. याकरिता किशोर शंभरकर यांच्यासह अहेरीवासीय सहकार्य करीत आहेत. (प्रतिनिधी)