शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चार तालुक्यात मलेरिया सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनील मडावी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मलेरिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. अहेरी उपविभागातील अनेक दुर्गम व अतिदुर्गम गावांमध्ये पक्के रस्ते नाही. बºयाच ठिकाणच्या नाल्यांवर पुलांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी ठेंगणे पूल आहेत.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा अलर्ट : धानोरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड तालुक्यात मोहिम प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/गडचिरोली : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा व तालुक्याचा आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासोबतच अहेरी उपविभागात मलेरियाचे रुग्ण आढळून आल्याने आता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून अहेरी उपविभागातील तीन व धानोरा मिळून एकूण चार तालुक्यात मलेरियाबाबतचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनील मडावी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मलेरिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. अहेरी उपविभागातील अनेक दुर्गम व अतिदुर्गम गावांमध्ये पक्के रस्ते नाही. बºयाच ठिकाणच्या नाल्यांवर पुलांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी ठेंगणे पूल आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना दवाखान्यापर्यंत औषधोपचारासाठी पोहोचणे कठीण होते. परिणामी दुर्गम भागातील रुग्ण मांत्रिकाचा आधार घेतात. परिणामी यामुळे रुग्ण दगावतो. अहेरी उपविभागातील भामरागड, एटापल्ली, अहेरी तसेच धानोरा तालुक्यात मलेरियाचा उद्रेक दरवर्षी पावसाळ्यात होत असतो. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने या चारही तालुक्यात ‘मिशन मलेरिया अंतर्गत’ सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. अहेरी तालुक्यात तीन चमू गावागावात जाऊन मलेरियाबाबत सर्वेक्षण करीत आहेत. तीन चमू मिळून एकूण १८ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण वानखेडे यांच्या नेतृत्वात चमू गावागावांना भेटी देऊन मलेरिया रोगाबाबत जाणीवजागृती करीत आहेत. घ्यावयाची काळजी, कराव्याच्या उपययोजना आदींची माहिती नागरिकांना देत आहेत.अहेरी तालुक्यातील महागाव बुज, पेरमिली, कमलापूर, जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावांना भेटी देण्यात आले असून तीन दिवसांत २० गावांमधील १ हजार ३७३ कुटुंबातील ६ हजार १२० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.अशाच प्रकारची आरोग्य तपासणी भामरागड, धानोरा व एटापल्ली तालुक्यात सुरू आहे. गावातील नागरिकांचा या सर्वेक्षण मोहिमेला प्रतिसाद व सहकार्य मिळत आहे. स्वच्छता पाळण्याबाबतचे आवाहन केले जात आहे.सकाळीच पथक होते गावात रवानासध्या खरीप हंगामातील धान रोवणीचे काम तालुक्यात सुरू आहे. गावातील बहुतांश नागरिक शेतीच्या कामासाठी शेतात जातात. गावातील नागरिकांची भेट होऊन तपासणी व्हावी, यासाठी मलेरिया मशिन अंतर्गत गठित केलेले पथक सकाळीच गावागावात रवाना होत आहे. नागरिकांशी चर्चा करून त्यांची आरोग्य तपासणी करीत आहेत.आरोग्य विभागाच्या वतीने मिशन मलेरिया सर्वेक्षण सुरू आहे. खबरदारी म्हणून मलेरियाबाबत ही आरोग्य तपासणी केली जात आहे. नागरिकांनी ताप वा इतर लक्षणे आढळून आल्यास चमूला सांगावे.- डॉ.किरण वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी, अहेरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य