शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Maharashtra Election 2019 ; अशिक्षित आदिवासींनी दाखविला पुन्हा एकदा लोकशाहीवर विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 00:21 IST

वास्तविक एटापल्लीसारख्या दुर्गम आणि बहुसंख्य आदिवासी असलेल्या गावांमध्ये आजही नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावात जाण्यासाठी चांगला रस्तासुद्धा नाही. पावसाळ्याच्या ५ महिन्यात तर अक्षरश: गाव ओलांडण्यासाठी पाण्यातून जावे लागते. जिथे जगण्यासाठीच संघर्ष सुरू असतो तिथे मतदानासारख्या राष्ट्रीय कर्तव्याशी काय घेणे-देणे? असा विचार या भागातील कोणीही नागरिक करू शकतो. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही.

रवी रामगुंडेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : अतिशय विपरित परिस्थिती असताना आणि सोयी-सुविधांपासून कोसो दूर असताना अशिक्षित आदिवासी नागरिकांनी मतदानासाठी दाखविलेला उत्साह शहरी नागरिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरला. किमान आतातरी निवडून येणारे लोकप्रतिनिधी किमान पुढील निवडणुकीपर्यंत या मतदारांसाठी मुलभूत सुविधा निर्माण करून देतील का? असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.वास्तविक एटापल्लीसारख्या दुर्गम आणि बहुसंख्य आदिवासी असलेल्या गावांमध्ये आजही नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावात जाण्यासाठी चांगला रस्तासुद्धा नाही. पावसाळ्याच्या ५ महिन्यात तर अक्षरश: गाव ओलांडण्यासाठी पाण्यातून जावे लागते. जिथे जगण्यासाठीच संघर्ष सुरू असतो तिथे मतदानासारख्या राष्ट्रीय कर्तव्याशी काय घेणे-देणे? असा विचार या भागातील कोणीही नागरिक करू शकतो. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. आपला लोकप्रतिनिधी आपण निवडला पाहीजे या भावनेतून नागरिकांनी जंगल तुडवत आणि छातीभर पाण्यातून वाट काढत मतदान केंद्र गाठले. विकासाच्या नावावर आतापर्यंत जरी काही मिळाले नसेल तरी किमान पुढच्या काळात तरी मिळेल या भाबड्या आशेने आदिवासी लोक मतदानासाठी सरसावले. विशेष म्हणजे नक्षल दहशतीला न जुमानता नागरिक मतदान केंद्रावर पोहोचल्याने त्यांना नक्षलवाद नको, विकास हवा हा संदेशही त्यांनी दिला.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली