शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

Lok Sabha Election 2019; उसेंडींच्या गोटात नेत्यांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:02 IST

गडचिरोली-चिमूर हा ४०० किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेला लोकसभा मतदार संघ अवघ्या १२ दिवसात पिंजून काढताना उमेदवारांना दम लागणार आहे. असे असताना काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या गोटात अजूनही निवडणुकीचा ‘माहौल’ थंडच आहे.

ठळक मुद्देमाहौल थंडच : कार्यकर्त्यांच्या भरवशावर सुरू आहे सिरोंचा ते सालेकसापर्यंतचा प्रचार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-चिमूर हा ४०० किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेला लोकसभा मतदार संघ अवघ्या १२ दिवसात पिंजून काढताना उमेदवारांना दम लागणार आहे. असे असताना काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या गोटात अजूनही निवडणुकीचा ‘माहौल’ थंडच आहे. गटातटात विखुरलेले काँग्रेसचे नेते प्रचारापासून दूर असल्याने कार्यकर्त्यांच्या भरोशावर सुरू झालेला प्रचार किती यशस्वी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.निवडणूक रिंगणातील दोन प्रमुख उमेदवारांपैकी काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी आणि भाजपचे अशोक नेते यांच्यातच काट्याची लढत आहे. डॉ.उसेंडी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर उमेदवारीच्या स्पर्धेत असलेले इतर तीनही उमेदवार गायब झाले आहेत. ज्येष्ठ नेते माजी खासदार मारोतराव कोवासे, आ.विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय असलेले डॉ.नितीन कोडवते आणि अपक्ष नामांकन भरून माघार घेणारे गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान हे सध्यातरी उसेंडी यांच्या प्रचारात प्रत्यक्ष उतरलेले नाहीत. त्यांना विश्वासात घेऊन कामी लावण्यात अद्याप उसेंडी यांना यश आलेले नाही. अशा स्थितीत त्यांचा एकाकी लढा किती टिकेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.गेल्या पाच वर्षात डॉ.उसेंडी यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या नात्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला. पण प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क ठेवण्यात ते मागे पडले. परिणामी ऐन निवडणुकीच्या वेळी मतदार संघातील दोन हजारांवर गावे पिंजून काढणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय झाले आहे. त्यातच या मतदार संघातील ६ पैकी केवळ ब्रह्मपुरी या एकाच विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे आमदार (विजय वडेट्टीवार) आहे. उर्वरित क्षेत्रात केवळ काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे आणि तेथील कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. वडेट्टीवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे वर्धा आणि चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात जबाबदारी सांभाळत आहेत. गडचिरोलीत उमेदवाराला आमची आवश्यकता वाटत नाही, अशी त्यांची खंत आहे. ऐन निवडणुकीत महिला आघाडी नेतृत्वहीन झाली तर महिला कार्यकर्त्यांना सांभाळणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे.वडेट्टीवार लक्ष देणार का?या मतदार संघात वर्क्तृत्वाने प्रभावभाली नेते म्हणून आ.विजय वडेट्टीवार यांची प्रतिमा आहे. पण त्यांच्या गटातील डॉ.कोडवते यांना या मतदार संघात उमेदवारी मिळाली नाही. दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात मात्र त्यांचा पाठींबा असलेल्या बाळू धानोरकर यांना उमेदवारी मिळाल्याने वडेट्टीवार धानोरकर यांच्यासाठी जास्त मेहनत घेतील हे स्पष्ट आहे. अशा स्थितीत ते गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी किती वेळ देऊ शकतील याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. तरीही रविवारी (दि.३१) हवाई सफर करत ते गडचिरोली जिल्ह्यात ७ ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. त्या सभांना किती गर्दी जमते त्यावरूनही लोकांच्या मनातील कौल लक्षात येऊ शकेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक