शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

जनसुरक्षेसाठी लॉकडाऊन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

रेशन दुकानांमधून मिळणारे धान्य वेळेत मिळण्याबाबत प्रशासनाला त्यांनी सूचित केले. जिल्ह्यातील गरजू लोकांना आवश्यक व शासनाने मंजूर केलेले धान्य वाटप होण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या. दुर्गम भागात रेशनचे धान्य पावसाळ्याआधी पोहचविण्यासंदर्भातील उपाययोजनांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

ठळक मुद्देआढावा बैठकीत पालकमंत्र्यांची स्पष्टोक्ती : २० एप्रिलनंतर महामार्गासह इतर कामांना गती येणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाची भूमिका लॉकडाऊन करून जनतेला अडचणीत आणण्याची नसून त्यांच्या सुरक्षेसाठीच सर्वकाही केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. कोरोना संसर्ग व त्याअनुषंगाने लागू केलेल्या संचारबंदीसंदर्भात ना.वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जि.प.सदस्य अ‍ॅड.रामभाऊ मेश्राम आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, स्थलांतरीत लोकांची व्यवस्था याबाबत आढावा घेण्यात आला. संचारबंदीची योग्य अंमलबजावणी आणि नागरिकांचे मिळालेले सहकार्य यामुळे गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त आहे. यापुढेही आपल्याला ही लढाई सुरू ठेवायची आहे. यादरम्यान काही लोकांना अडचणी निर्माण होत आहेत, मात्र प्रशासन त्यासाठी आवश्यक ती मदत वेळेत पोहोचवत आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा पुढेही अखंड सुरू राहील. नागरीकांनी काळजी करू नये, असा दिलासा पालकमंत्र्यांनी दिला.रेशन दुकानांमधून मिळणारे धान्य वेळेत मिळण्याबाबत प्रशासनाला त्यांनी सूचित केले. जिल्ह्यातील गरजू लोकांना आवश्यक व शासनाने मंजूर केलेले धान्य वाटप होण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या. दुर्गम भागात रेशनचे धान्य पावसाळ्याआधी पोहचविण्यासंदर्भातील उपाययोजनांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.जिल्हा कोरोनामुक्त राहण्यासाठी बाहेरील व्यक्ती आत येता कामा नये. जिल्ह्यात येण्यासाठी गरजूंच्या कारणांची छाणणी करा. अत्यावश्यक कारण असेल तरच त्यांची तपासणी करून प्रवेश देण्यात यावा, असे त्यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितले. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्ह्याबाहेर राहू नये. जर असे लोक बाहेरु न आले तर त्यांना क्वारंटाईन करण्याची सूचनाही ना.वडेट्टीवार यांनी केली.शेतीविषयक कामांना अडथळे नाहीतशेतीविषयक कामांना कोणत्याही प्रकारे प्रशासनाकडून बंधने नाहीत. शेतकऱ्यांनी आपली कामे करावीत. फक्त हे करताना गर्दी टाळून कोरोना संसर्गाचा धोका दूर ठेवावा, असे पालकमंत्र्यानी स्पष्ट केले.संचारबंदीमुळे सर्वच कामांना बंदी घालण्यात आली होती. त्याचा फटका तेंदूपत्ता संकलनालाही बसला. तेंदूपत्ता संकलन हा जिल्ह्यातील महत्वाचा व्यवसाय असून त्याबाबत आता परवानगी देता येईल, अशी सूचनाही या बैठकीत ना.वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी