शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पावसामुळे रोवलेल्या धानाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:30 AM

१५ दिवसांच्या उसंतीनंतर शुक्रवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. यामुळे रोवलेल्या धान पिकाला दिलासा मिळाला आहे. मात्र रोवणीची कामे सुरू होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा सुरू आहे.

ठळक मुद्देशुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी : पुरेशा पाण्याअभावी मात्र रोवणीची कामे खोळंबलेलीच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १५ दिवसांच्या उसंतीनंतर शुक्रवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. यामुळे रोवलेल्या धान पिकाला दिलासा मिळाला आहे. मात्र रोवणीची कामे सुरू होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा सुरू आहे.जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अगदी वेळेवर व समाधानकारक पाऊस पडत होता. त्यामुळे रोवणीची कामे वेळेवर सुरूवात झाली. त्यानंतर मात्र पावसाने जवळपास १५ ते २० दिवस उसंत घेतली. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांध्यांमधील पाणी आटले. त्यामुळे रोवणीची कामे बंद पडली. त्याचबरोबर रोवलेल्या धानाच्या बांधितही पाण्याअभावी फटी पडू लागल्या व धानाचे पीक करपायला लागले होते. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली होती. यावर्षी सुध्दा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा शक्यता वर्तविली जात होती. मात्र शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. शनिवारी दिवसभर पाऊस पडत होता. या पावसामुळे करपणाºया धान पिकाला दिलासा मिळाला आहे.पावसाचे प्रमाण कमी असल्याने अजूनपर्यंत खोळंबलेली रोवणीची कामे मात्र सुरू झाली नाही. रोवणी पुन्हा सुरू होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. धान पिकाची रोवणी जेवढी उशीरा होते, तेवढी उत्पादनात घट होते. हा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी आॅगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र अजुनही जवळपास ३० टक्के रोवणी झाली नाही. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.४० हजार हेक्टर क्षेत्र रोवणीविनापावसाने उसंत घेतल्याने जवळपास ४० हजार हेक्टर क्षेत्रावर अजुनही धान पिकाची रोवणी झाली नाही. हे शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. शनिवारी दिवसभर पावसाची रिपझीप सुरू होती. मात्र अशा पावसामुळे धानाच्या बांधीत रोवण्यायोग्य पाणी साचत नाही. रोवणे सुरू होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. धानाचे पºहे टाकल्याला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटला आहे. उशीरा रोवणी झाल्याने उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे.पुढील ४८ तासात गडचिरोली जिल्ह्यात एक ते दोन ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सखल भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती