शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

अहेरीत वकिलांचे कामबंद सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 6:00 AM

अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व्हावे, यासाठीचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाने विधी व न्याय मंत्रालयात पाठविला होता. विधी व न्याय मंत्रालयाने प्रस्ताव मंजूर केला. मात्र अजूनपर्यंत जिल्हा व सत्र न्यायालयाचा दर्जा दिला नाही. त्यामुळे वादी व प्रतिवादींना गडचिरोली येथे जावे लागत आहे. सामान्य वादी, प्रतिवादींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देसिरोंचातही आंदोलन : अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व्हावे, या प्रमुख मागणीसाठी सोमवारपासून अहेरी व सिरोंचा येथील वकिलांनी (अधिवक्ता) कामबंद आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. विशेष म्हणजे मंगळवारी सिरोंचा येथे वकिलांच्या समर्थनार्थ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाडला.गडचिरोली जिल्हा लांबीने अतिशय मोठा आहे. सिरोंचा येथील एखाद्या नागरिकाचा गडचिरोलीतील जिल्हा न्यायालयात खटला सुरू असेल तर तारखेच्या वेळी एक दिवसाच्या मुक्कामानेच गडचिरोली येथे यावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन मागील अनेक वर्षांपासून अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व्हावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. त्यादृष्टीने अहेरीत विस्तीर्ण इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे लोकार्पण ३ एप्रिल २०१५ रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले होते.अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व्हावे, यासाठीचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाने विधी व न्याय मंत्रालयात पाठविला होता. विधी व न्याय मंत्रालयाने प्रस्ताव मंजूर केला. मात्र अजूनपर्यंत जिल्हा व सत्र न्यायालयाचा दर्जा दिला नाही. त्यामुळे वादी व प्रतिवादींना गडचिरोली येथे जावे लागत आहे. सामान्य वादी, प्रतिवादींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी लक्षात घेतल्यानंतर काही नागरिक न्यायालयात प्रकरणे दाखल करीत नाहीत. परिणामी नागरिकांना न्यायापासून वंचित राहावे लागते.ही अडचण लक्षात घेऊन अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व्हावे, या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.वकिलांच्या आंदोलनाला सामान्य नागरिकांकडूनही पाठिंबा मिळत आहे. वकिलांनी कामबंद केल्याने न्यायालयाचे कामकाज ठप्प पडले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा वकिलांनी दिला आहे.आमची मागणी जनतेच्या हिताची असतानाही शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाचे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पुढील रणनिती ठरविली जाणार आहे. भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र होईल.- अ‍ॅड.संघरत्न कुंभारे, तालुकाध्यक्ष,अधिवक्ता संघटना, अहेरी

टॅग्स :Courtन्यायालय