शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शेवटचा माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:44 PM

विकासाचा केंद्रबिंदू हा शेवटचा माणूस, अर्थात आपला ‘आम आदमी’ आहे. लोककल्याणाच्या विविध योजनांमधून विकासाची गंगा अशाच पध्दतीने पुढे नेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके यांनी केले.

ठळक मुद्देआदिवासी विकासमंत्र्यांची ग्वाही : लोककल्याणाच्या योजनांमधून विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी कटीबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विकासाचा केंद्रबिंदू हा शेवटचा माणूस, अर्थात आपला ‘आम आदमी’ आहे. लोककल्याणाच्या विविध योजनांमधून विकासाची गंगा अशाच पध्दतीने पुढे नेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके यांनी केले. स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण व सत्कार कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.गुरूवारी डॉ.उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर विविध विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळयाला खासदार अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांच्यासह इतर पदाधिकारी, अधिकारी, नागरीक उपस्थित होते.यावेळी डॉ.उईके यांनी गडचिरोली जिल्हयातील विविध विकास कामांची माहिती त्यांनी जनतेसमोर ठेवली. जिल्हयातील ३५,३३१ शेतकºयांना १०० कोटी १९ लक्ष रूपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. शेतीविषयक उत्पन्नात वाढ करण्यासाठी कर्ज स्वरूपात २० हजार ५९ शेतकºयांना ८४ कोटी २८ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. शबरी घरकुल योजनेतून २०१५-१६ पासून आजपर्यंत ९४८ घरकुलांचा लाभ देण्यात आला. आदिम जमाती घरकुल योजनेतून ३०० घरकुलांचा लाभ देण्यात आला. आता आदिम जमाती घरकुल योजनेचा लक्ष्यांक ५०० करण्यात आला आहे. १९९२ साली सुकथनकर समितीने राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी विकासाकरीता ९ टक्के निधीची तरतूद द्यावी अशी शिफारस केली. २०१४ ला मुख्यमंत्र्यांंच्या नेतृत्वात ९ टक्के निधी आदिवासी विकासाकरीता देण्यास सुरूवात झाली. पेसाअंतर्गत येणाºया ग्रामपंचायतींना ५ टक्के निधी देण्यात येत आहे आणि हा भारतातील पहिला निर्णय ठरला आहे. यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. संचालन क्र ीडा अधिकारी मदन टापरे यांनी तर आभार उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी मानले.सत्कारास पात्र ठरलेले अधिकारी-कर्मचारीध्वजारोहण कार्यक्र मानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाºयांचा आदिवासी विकासमंत्र्यांनी गौरव केला. यावेळी बहुतांश सत्कारार्थी आपापल्या भागातील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने मंत्र्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारू शकले नाही.संत गाडगेबाबा अभियानासाठी धानोरा तालुक्यातील जांभळीचे रत्नमाला बावणे (सरपंच) व किशोर कुलसंगे (सचिव) यांना प्रथम, कुरखेडा तालुक्यातील अरततोंडीचे प्रियंका हलामी (सरपंच) व महेंद्र देशमुख (सचिव) यांना द्वितीय तर आरमोरी तालुक्यातील मानापूरचे धनीराम कुमरे (सरपंच) व वैशाली ढोरे (सचिव) यांना तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.सत्कारास पात्र ठरलेल्यांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल एटापल्लीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, गट्टाचे आरएफओ एम.एम.पाटील, सिरोंचाचे सहायक वनसंरक्षक एम.एम.गाजलवार यांचा समावेश होता.कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हेडरीचे एसडीपीओ शशिकांत भोसले, सी-६० पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक नेताजी वडगर, गट्टाचे उपनिरीक्षक संदीप बोरकर, अहेरीचे उपनिरीक्षक सचिन जनक यांचा समावेश होता.मतदान केंद्राध्यक्ष, अधिकाºयांमध्ये शैलेंद्र अंबादे, स्वप्नील पाझारे, गणू गोरे, रुपेश नागदेवते, वामन पोरेटी, राहुल अंधार, पी.ए.गेडाम, अश्विन सोनुले, कपिलकुमार शर्मा, किशोर गोटा, एन.जे.पेंदोर, अलताब शेख, गिरीष तुलावी आदींचा समावेश होता. आदर्श तलाठी म्हणून आरमोरी तालुक्यातील देलोडाचे तलाठी पी.एम.धात्रक यांना सन्मानित करण्यात आले.आरोग्य विभागातील चांगल्या सेवेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.सुनील मडावी आदींसह वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देत असलेले डॉ.मिलिंद मेश्राम, डॉ.प्रमोद उंदीरवाडे, बेबी वड्डे, डॉ.अभिजित गादेवार, डॉ.भूषण लायवर, डॉ.भुवन मेश्राम, डॉ.राम लडके, डॉ.वागराज धुर्वे, आनंद मोडक यांचा सत्कार करण्यात आला.गोवर रूबेला लसीकरणासाठी लॉयन्स क्लबच्या अध्यक्ष संध्या लडके, अ‍ॅम्बेसेडर, एंजल देवकुले, तसेच सामाजिक वनीकरणातील कामगिरीसाठी जि.प.प्राथमिक शाळा ठाकरी, ता.चामोर्शी यांना शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने (५० हजार रुपये) सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :ministerमंत्रीPoliceपोलिस