शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अनेक तलाव मोजताहेत शेवटची घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 22:31 IST

मृग नक्षत्र उत्तरार्धाकडे वळला असून वरूण राजाच्या आगमनाचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा चांगल्या प्रकारची जल क्षमता असलेले अनेक तलाव देखील आता शेवटच्या घटका मोजत असल्याने अनेक गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजलक्षमता घटली : पाऊस बरसत नसल्याने शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : मृग नक्षत्र उत्तरार्धाकडे वळला असून वरूण राजाच्या आगमनाचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा चांगल्या प्रकारची जल क्षमता असलेले अनेक तलाव देखील आता शेवटच्या घटका मोजत असल्याने अनेक गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.आरमोरी-वैरागड मार्गावरील वैरागडपासून चार किमी अंतरावर पाण्याची टाकी म्हणून ओळखल्या जाणाºया तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होता. दरवर्षीच्या उन्हाळ्यात या तलावात पाच फुटापेक्षा कमी जलसाठा कधीही राहत नव्हता, असा अनुभव अनेकजण सांगतात. मात्र या वर्षात सदर तलावाने तळ गाठला आहे. या तलावाच्या परिसरात राहणारे वन्यजीव आपली तृष्णा तलावाच्या पाण्यावर भागवित होते. मात्र आता वन्यजीवांची भटकंती वाढली आहे. काही दिवसानंतर वन्यजीवांना पाणी मिळणे कठीण होणार आहे. जंगलातील लहान, मोठे सर्व जलसाठे कोरडे पडले असून वन्यजीवांची तहाण भागविण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याअभावी अनेक वन्यजीव तडफडून प्राण सोडत आहेत. ज्या ठिकाणी अल्प जलसाठा आहे, त्या ठिकाणी शिकार करणारे लोक सापळे रचून प्राणी व पक्षांची शिकार करीत असल्याचे दिसून येत आहे. वैरागड परिक्षेत्रातील चूनबोडी, महादेव तलाव, गोरजाई डोहाने यावर्षी तळ गाठला आहे.जलसाठे कोरडे पडल्याने जनावरांना तहाण भागविणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतिक्षा असून ज्या शेतकºयांकडे सिंचन सुविधा आहे, असे शेतकरी धान लागवडीसाठी पºहे टाकत आहेत. पावसाने लवकर हजेरी लावल्यास खरीप हंगामाला वेग येणार आहे. शेतकरी वर्ग वरूण राजाची चातक पक्ष्याप्रमाणे प्रतिक्षा करीत आहे.

टॅग्स :Waterपाणी