शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

काेराेनामुळे उर्सच्या आनंदावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:41 IST

सिराेंचा : येथील प्राणहिता नदीच्या तीरावर असलेला शाहावली हैदरबाबा यांचा दर्गा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळख आहे. या ठिकाणी दरवर्षी ...

सिराेंचा : येथील प्राणहिता नदीच्या तीरावर असलेला शाहावली हैदरबाबा यांचा दर्गा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळख आहे. या ठिकाणी दरवर्षी रजाबच्या १६ ला संदल व १७ ला उर्सचे (मार्च) आयाेजन केले जाते. तेलंगणा, छत्तीसगड राज्य व सिराेंचा तालुक्यातील हजाराे भाविक उर्ससाठी सिराेंचा येथे दाखल हाेत हाेते. मात्र, मागील वर्षीपासून काेराेनामुळे उर्स रद्द करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आनंदरावर विरजन पडले आहे.

सिराेंचा येथे शाहावली हैदरबाबांचा दर्गा आहे. त्यांचा जन्म तेलंगणा राज्यातील आसिफाबाद तालुक्यातील तांडूर या गावी झाला. लहानपणापासूनच ते आध्यात्मिक वृत्तीचे हाेते. नमाज पडण्यासाठी पवित्र जागेचा शाेध घेत असताना १६९८ ला सिराेंचापर्यंत पाेहाेचले. सिराेंचा येथील प्राणहिता नदीकाठची जागा त्यांच्या मनाला भावली. त्यांनी प्राणहिता नदीजवळ असलेल्या विठ्ठलेश्वर मंदिराजवळ नमाज पठण करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी किल्ला व दर्गाचे काम करण्यात आले. बाबांच्या निगरानीखाली दर्गा तयार झाला. त्यानंतर बाबांनी स्वत:च्या आकाराचे संदुक तयार केले. दर्ग्याची पूजाअर्चा, साफसफाई व धार्मिक कार्य पार पाडण्याची जबाबदारी माे. काशिम यांच्याकडे साेपवून बाबांनी दर्ग्यात चिर विश्रांती घेतली. माे. काशिम यांच्यानंतर ही जबाबदारी त्यांच्या मुलांवर आली. पिढ्यानपिढ्या ते जबाबदारी सांभाळत आहेत.

हजरतबाबा वली हैदरशाहा यांच्या वार्षिक उर्सचे आयाेजन उर्स कमिटीतर्फे केले जाते. पहिल्या दिवशी सायंकाळी ७ वाजता बल्हारशाहा येथील संदल शरीफची सुरुवात दर्ग्यापासून केली जाते. त्यानंतर सिराेंचा शहरातील मुख्य मार्गाने फिरत जाऊन शेवटी दर्ग्यामध्येच पाेहाेचते. रात्रीच्या सुमारास कव्वाली राहते. दुसऱ्या दिवशी उर्स आयाेजित केला जाताे. उर्समध्ये खेळण्यांची दुकाने, मिठाईची दुकाने, साैंदर्य प्रसाधने, विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री हाेते. या उर्सच्या माध्यमातून सिराेंचात सर्वधर्मसमभाव दिसून येतो.

बाॅक्स ....

इंग्रजांनी पाडला किल्ला

शाहावली हैदरबाबा यांनी बांधलेला किल्ला इंग्रज राजवटीत पाडण्यात आला. जाे कुणी किल्ला पाडण्यास मदत करेल, त्याला किल्ल्याचे दगड नेण्यास मुभा दिली जाईल, असे फर्मान इंग्रज अधिकाऱ्यांनी काढले. त्यानंतर किल्ला पाडण्यात आला. या दगडांचा वापर तुरूंग व इतर इमारतींच्या बांधकामासाठी करण्यात आला. शाहावली हैदरबाबा हे घाेड्याने सिराेंचा येथे आले. सिराेंचा येथेच हा घाेडा मरण पावला. त्याचीही समाधी या ठिकाणी आहे.

बाॅक्स ..

ध्वजाच्या तुकड्यांचे विशेष महत्त्व

उर्सदरम्यान पहाटे चार वाजता जुना काळा ध्वज उतरवून नवीन काळा ध्वज चढविला जातो. यावेळी जुन्या काळ्या ध्वजाचे तुकडे केले जातात. हे तुकडे भाविकांना दिले जातात. भाविक हे तुकडे छाेट्या पेटीत ठेवतात किंवा कंबर किंवा भुजेला बांधतात. ध्वजाचा तुकडा बांधल्यामुळे बाबांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त हाेताे. संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त हाेते, अशी मान्यता आहे. ध्वजाची दाेरी हिंदू व्यक्ती ताटीकाेंडावार यांच्याकडे सुरक्षित ठेवली जाते. ध्वजाराेहणानंतर सर्व दानपेट्या उघडतात. या दानपेटीत एक ते दीड लाख रुपयांची रक्कम जमा होते. ही उर्सच्या खर्चासाठी वापरली जाते.