शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
4
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
5
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
6
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
7
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
8
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
9
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
10
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
11
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
12
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
14
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
15
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
16
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
17
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
18
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
19
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
20
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

जेसीबी लावून तोडली वनविभागासह महसूलच्या जमिनीवरील १४०८ झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:00 IST

फुलझेले कुटुंबीयांनी चुरचुरा या गावाजवळ जागा विकत घेतली होती. सर्व्हे नंबर १८, १९ मध्ये आपली जागा असल्याचे सांगत त्यांनी लगतच्या २७ ते २८ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून त्यावरील झाडे जेसीबी लावून पाडली आणि ती कोणाला दिसून नये म्हणून १८ मोठे खड्डे खोदून त्याखाली गाडून ठेवल्याचे वनविभागाने केलेल्या तपासणीत आढळल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी यांनी सांगितले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनविभाग आणि महसूल विभागाच्या तब्बल २८ एकर जमिनीवर अतिक्रमण करून ती हडपण्याचा एका कुटुंबाचा प्रयत्न गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. याप्रकरणी त्या कुटुंबावर गुन्हाही दाखल झाला. या प्रकरणात संबंधित कुटुंबाने जेसीबी लावून तब्बल १४०८ झाडे पाडल्याचे वनविभागाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. एवढ्या राष्ट्रीय संपत्तीची आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या त्या कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. हा प्रकार गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा या गावाजवळ घडला. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी असलेल्या गायत्री फुलझेले यांच्यासह त्यांची दोन मुले प्रणय आणि प्रांजल तसेच अतिक्रमणास मदत केल्याच्या आरोपाखाली निळकंठ सिडाम अशा चार जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला. यापैकी सिडामला अटकही केली, पण त्याला जामीन मिळाला.प्राप्त माहितीनुसार, फुलझेले कुटुंबीयांनी चुरचुरा या गावाजवळ जागा विकत घेतली होती. सर्व्हे नंबर १८, १९ मध्ये आपली जागा असल्याचे सांगत त्यांनी लगतच्या २७ ते २८ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून त्यावरील झाडे जेसीबी लावून पाडली आणि ती कोणाला दिसून नये म्हणून १८ मोठे खड्डे खोदून त्याखाली गाडून ठेवल्याचे वनविभागाने केलेल्या तपासणीत आढळल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी यांनी सांगितले. गावकऱ्यांनी वेळीच या प्रकाराची तक्रार वनविभागाकडे केल्यानंतर वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी स्वत: त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. कनिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई आणि तपासासाठी सूचना केल्या.

दुसऱ्या दिवशी येतो, असे सांगून कुटुंब गायब- या प्रकरणी जबाब घेण्यासाठी फुलझेले कुटुंबातील तीनही सदस्यांना वनविभागाने १४ ऑगस्ट रोजी नोटीस देऊन लगेच येण्यास सांगितले. पण त्यांनी दुसऱ्या दिवशी जबाब देण्यासाठी येतो, असे सांगून वनकर्मचाऱ्यांना परत पाठविले. पण त्यानंतर हे कुटुंब गायब झाले. जिल्हा परिषदेतील ड्युटीवरही गायत्री फुलझेले हजर नसल्याचे सांगितले जाते. वन विभागाला त्यांच्या येण्याची प्रतीक्षा लागली आहे. 

...म्हणून वाढले वाघाचे हल्ले?- दरम्यान, ज्या चुरचुरा परिसरातील जंगलाच्या साहाय्याने वाघाचा वावर होता तेच जंगल भुईसपाट केल्यामुळे वाघाने आपला मोर्चा गावाच्या आणखी जवळ वळविला असून त्यामुळे वाघाचे हल्ले वाढले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वनजमिनीवर अशा पद्धतीने वाढत असलेले मानवी अतिक्रमणच जंगली प्राण्यांकडून होत असलेल्या हल्ल्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जाते. याबद्दल नागरिकांमध्ये संताप आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणforestजंगल