शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

माणसापेक्षा म्हणे बरे लागते वांगे..

By admin | Updated: January 5, 2015 23:02 IST

विनोदी काव्यपंक्ती सादर करून सुप्रसिध्द विनोदी कवी डॉ. मिर्झा बेग यांनी सध्याच्या युगात सर्वच पिकांवर रासायनिक फवारणी केली जात असल्याने माणसाच्या खाण्यातही त्याचा अंश असतो.

समाज प्रबोधनही केले : गडचिरोलीत मिर्झा एक्सप्रेस सुसाट धावलीदिलीप दहेलकर - गडचिरोली‘एक वाघ दुसऱ्या वाघाला असा सांगेमाणसापेक्षा म्हणे बरे लागते वांगे,माणसात आता राहिली नाही चव रसायन खाऊ खाऊ झाला बेचव’ अशा विनोदी काव्यपंक्ती सादर करून सुप्रसिध्द विनोदी कवी डॉ. मिर्झा बेग यांनी सध्याच्या युगात सर्वच पिकांवर रासायनिक फवारणी केली जात असल्याने माणसाच्या खाण्यातही त्याचा अंश असतो. त्यामुळे वाघाला माणसाचे मांस बेचव वाटते, असे सांगितले. डॉ. बेग यांनी भाषा, संस्कृती, शिक्षण, पोलीस व्यवस्था, शेतकरी आत्महत्या, पे्रेम, मराठी, इंग्रजी भाषा, देशाची परिस्थिती आदी विषयांवर प्रकाश टाकला. निमित्त होते, जि.प. शिक्षण विभाग व माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्यावतीने स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणातील ‘संत ज्ञानेश्वरी नगरीत’ आयोजित ग्रंथ महोत्सव. ग्रंथ महोत्सवाच्या व्यासपीठावर डॉ. मिर्झा बेग यांचा कॉमेडी एक्सप्रेस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मातृभाषा असलेल्या मायमराठी भाषेवर इंग्रजी राजवटीमुळे अद्यापही प्रभाव असल्याचे सांगताना ते म्हणाले, ‘ढेकर देत गेले इंग्रज तिथं जेवून, पण इंग्रजीचं इथं मढं देलं ठेवून, मातृभाषा विसरून इंग्रजीत बोलते, माय साठी दाठ्ठा बंद सासूसाठी खोलते’ मराठी वर्ष असलेल्या गुढीपाडव्यापेक्षा इंग्रजी कॅलेंडरमधील नवर्षाला साऱ्यांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो, हे सांगताना ते म्हणाले, १ जानेवारीले बायको आली रंगात, इंग्रजाहीच भुत घुसलं तिच्या अंगात, लाडावून म्हने मले ओ माय डिअर, साजरा करू म्हने आपण न्यू ईअर ‘शेतकऱ्यांनो आता घेऊ नका फाशी’, या काव्यपंक्ती सादर करून मिर्झा बेग यांनी शेतकऱ्यांना व्यापक दृष्टीकोण बाळगून जीवन जगण्याचा सल्ला दिला. काल माझ्या स्वप्नात माय मराठी आली,दाखवली तीनं मले झोयी तिची खाली,चेहऱ्यावरून वाटत होती थकल्यासारखी, असं म्हणून मराठी पक्षासारखी फडफडली, झोपीतून मी उठलो छाती माही धडधडली,मराठीची प्रतिभा ज्ञानेश्वरीत सामावते, ग्रामगीता गाथाही मराठीतच मावते, लावणीतून मराठीचे सौंदर्य ओसंडते, शौर्य आणि औदार्य पोवाड्यातून सांडते,मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले,गाडगेबाबा मराठीतच जन्म घेऊन गेले, अमृताशी पैज जिंकते मराठी बोलीया काव्यातून डॉ. मिर्झा बेग यांनी मराठी भाषेचे अगाध महत्त्व रसिकांना पटवून दिले. त्यानंतर डॉ. मिर्झा बेग यांनी आपल्या विनोदी काव्यातून भोंदूगिरीवरही हल्ला चढविला. गणित, क्रिकेट, धर्म, जात या विषयावरील विनोदी काव्यातून प्रबोधन केले. याशिवाय सध्या टेलिव्हीजनवरील विविध चॅनेलवर दाखविण्यात येत असलेल्या हिंदी मालिकांमधील भंपकपणावर भाष्य केले. महिलांची गाथा व महिमा मोठी असल्याचेही त्यांनी काव्यातून पटवून दिले. अनेक सामाजिक विषयांवर त्यांनी प्रबोधन केले.या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते आदींसह गडचिरोली शहरातील व परिसरातील हजारो रसिक उपस्थित होते. दरम्यान, रसिक कॉमेडी एक्सप्रेसच्या माध्यमातून हसून, हसून लोटपोट झाले.