शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

लवकरच सुरू होणार आंतरजिल्हा वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोलीत कोरोनाची स्थिती चांगली आहे. नागरिकांनी केलेले सहकार्य आणि प्रशासनाचे चांगले नियोजन यामुळे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे. शिवाय मृत्यू नगण्य असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून जिल्ह्याला ५.५ कोटी तर जिल्हा नियोजन समितीमधील २५ टक्के निधी उपलब्ध करून दिल्याचे ना.वडेट्टीवार यांनी सांगितले.

ठळक मुद्देपालकमंत्री : जनजीवन सुरळीत करण्यासाठी खबरदारी घेऊन उपाययोजना राबविण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या १ जुलैपासून प्रतिबंधित क्षेत्र आणि रेड झोनवगळता इतर भागातील आंतरजिल्हा वाहतूक (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) विनापास सुरू होऊ शकते. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून ते याबाबतचा निर्णय घेऊन जाहीर करतील, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रपरिषदेत दिली. जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोलीत कोरोनाची स्थिती चांगली आहे. नागरिकांनी केलेले सहकार्य आणि प्रशासनाचे चांगले नियोजन यामुळे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे. शिवाय मृत्यू नगण्य असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून जिल्ह्याला ५.५ कोटी तर जिल्हा नियोजन समितीमधील २५ टक्के निधी उपलब्ध करून दिल्याचे ना.वडेट्टीवार यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आ.डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, हरीराम वरखडे, जि.प.सदस्य राम मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याने जनजीवन सुरळीत करण्यासाठी विशेष खबरदारी घेवून उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. लोकांमधील कोरोनाची भिती दूर झाली असली तरी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना उद्देशून केले. प्रशासन सर्व कामांना टप्प्याटप्प्याने मंजुरी देत आहे. आदिवासी भागात तीनही प्रकल्प अधिकाºयांना दोन-दोन हजार घरकुलांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. आदिवासी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाकडून येणारा निधी खर्च करावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे प्रामुख्याने उपस्थित होते.गडचिरोली व अहेरीसाठी अत्याधुनिक स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांचे प्रस्तावगडचिरोली आणि अहेरी येथे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी डीजिटल अत्याधुनिक अभ्यासिका सुरू करण्यासाठी प्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थी व सर्वसाधारण विद्यार्थ्यांना अनुक्रमे ७० व ३० टक्के याप्रमाणे त्याचा लाभ घेता येणार आहे. तसेच ५० एकर जागेत रोजगार प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार असून लष्करी प्रशिक्षणाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिस्तबद्धतेची शिकवण तिथे मिळेल. त्याबाबत प्रस्ताव पाठविला जात आहे. आदिवासी विकास विभागाकडून त्यासाठी निधी मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यातून चांगले अधिकारी निर्माण होण्यासाठी व शिक्षणाची गोडी स्थानिक युवकांना लागण्यासाठी याचे नियोजन केला जात आहे.मेडिकल कॉलेज व प्रयोगशाळेची प्रक्रि या अंतिम टप्प्यातजिल्ह्यात मंजुरी मिळालेले मेडिकल कॉलेज पुढील शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. २.१८ कोटींची प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. या लॅबमुळे कोरोना चाचण्यांसह इतर आजारांवरील चाचण्याही जिल्ह्यातच होणार आहेत. 

टॅग्स :Socialसामाजिक