शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

मासे व भाजीपाला उत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:20 AM

राज्यातील काही भागात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेचे सकारात्मक फायदे सर्वत्र पाहावयास मिळाले. आरमोरी तालुक्यात ७१८ शेततळ्यांची निर्मिती झाल्याने २ हजार १५४ एकर शेती क्षेत्र सिंचनाखाली आले.

ठळक मुद्देशाश्वत शेती : आरमोरी तालुक्यात ७१८ शेततळ्यांमुळे २१५४ एकर शेतीला सिंचन

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : राज्यातील काही भागात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेचे सकारात्मक फायदे सर्वत्र पाहावयास मिळाले. आरमोरी तालुक्यात ७१८ शेततळ्यांची निर्मिती झाल्याने २ हजार १५४ एकर शेती क्षेत्र सिंचनाखाली आले. शिवाय मत्स्यपालन व भाजीपाला लागवडीतही भरघोस वाढ झाली.शेततळ्यांमुळे खरीप व रबी हंगामातील पिकाला सिंचनाची सोय उपलब्ध झाली. एवढेच नव्हे तर आरमोरी तालुक्यातील शंकरनगर, देविपूर, वडधा या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील शेततळ्यात मत्स्यबीज टाकून मत्स्यपालनसुद्धा करून आर्थिकदृष्ट्या नफ्याची शेती केली आहे. शेततळ्यासाठी १२ आर क्षेत्र लागत असून शेततळ्याच्या पाळीवरील ६ आर जागेत तुरीचे पीक घेतले जात आहे. त्यामुळे शेततळ्यात अत्यल्प क्षेत्र कामी लागत आहे.शेततळ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडते. तसेच आवश्यकतेनुसार पिकाला पाणीसुद्धा देता येते. त्यामुळे शेततळे विविध पिकांसाठी वरदान ठरत आहे. तालुक्यातील अन्य ठिकाणीसुद्धा शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी मत्स्यपालनासह भाजीपाला लागवडीकडे अधिक लक्ष देत आहेत. तालुक्यातील १०३ गावांमध्ये शेततळ्यांचे काम झाले आहे.अपुºया व अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक अंतिम टप्प्यात पावसाअभावी नष्ट होते. अथवा अत्यल्प उत्पादन मिळते. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता शेतकºयांनी शासकीय योजनांच्या लाभातून सिंचन सुविधा निर्माण करावी.- एस. पी. ढोणे, तालुका कृषी अधिकारी., आरमोरी

टॅग्स :Waterपाणी