शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 6:00 AM

समग्र शिक्षा या राज्य शासनाच्या प्रकल्पात २००१ पासून सुमारे सहा हजार कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. सदर कर्मचारी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे, शासनाच्या योजना राबविणे, आदी कामे करीत आहेत. हे कर्मचारी मागील १५ ते १९ वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । संघटनेचे विधानसभा अध्यक्षांना निवेदन; विविध समस्यांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : समग्र (सर्व) शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेऊन नियमित करावे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.समग्र शिक्षा या राज्य शासनाच्या प्रकल्पात २००१ पासून सुमारे सहा हजार कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. सदर कर्मचारी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे, शासनाच्या योजना राबविणे, आदी कामे करीत आहेत. हे कर्मचारी मागील १५ ते १९ वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहेत. यातील सर्वच कर्मचाऱ्यांनी शासकीय नोकरी मिळविण्याची वयोमर्यादा ओलांडली आहे. १९ वर्षांपासून काम करीत असतानाही अजूनपर्यंत त्यांना कायम करण्यात आले नाही. अनेक वेळा मोर्चे, आंदोलने, निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र शासनाने त्यांना न्याय दिला नाही. सेवेत कायम नसल्याने त्यांचे भवितव्य अधांतरी आहे. शासनाने त्यांना कमी केल्यास जीवन जगणे कठीण होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे उपाध्यक्ष वकील खेळकर, अरविंद घुटके, राजेंद्र बांगरे, रामकृष्ण रहांगडाले, एच. के. शहारे, अल्का सोनीकर, वैशाली खोब्रागडे, अमोल पडोले, करूणा बागेसर, दिपाली गुडेपवार, अविनाश झिलपे आदी उपस्थित होते.शिक्षण विभागात कायम करासध्या शिक्षण विभागात अनेक रिक्त पदे आहेत. या पदांवर सर्व शिक्षा अभियानमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास शासनाला कुशल मनुष्यबळ प्राप्त होईल. अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात सदर कर्मचारी कार्यरत असल्याने शिक्षण क्षेत्रातील अनेक योजनांची या कर्मचाऱ्यांना माहिती आहे. याचा लाभ शिक्षण क्षेत्राला होईल. तसेच मागील अनेक वर्षांपासून लढा देत असलेल्या सर्व शिक्षा अभियानच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल. शासनावर अतिरिक्त बोजाही पडणार नाही. यापूर्वीच्या शासनाने सर्व शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. किमान विद्यमान शासनाने तरी या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.१९ वर्षांच्या सेवेनंतरही अल्प मानधनसर्व शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी मागील १९ वर्षांपासून नियमित सेवा बजावत आहेत. १८ वर्षानंतरही त्यांना अल्प मानधन दिले जाते. या मानधनात कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. मात्र दुसरा रोजगार मिळत नसल्याने नायलाजास्तव ही नोकरी करावी लागत आहे. मानधनात वाढ करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकNana Patoleनाना पटोले