शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

२००९ मध्येच भाजपसोबत युतीची राष्ट्रवादीत चर्चा; सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट

By संजय तिपाले | Updated: November 7, 2023 17:02 IST

काही जण सिनेमाप्रमाणे ग्लिसरीन लावून रडतात

गडचिरोली : विकासाच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ९० टक्के आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, पण काही जण विचारधारेविरुद्ध निर्णय घेतल्याचे सांगून सिनेमात जसे ग्लिसरीन लावून रडतात तसे काही जण रडत आहेत, अशी खरमरीत टीका प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी केली.  २००९ मध्येच लोकसभा निवडणुकीला भाजपसोबत युतीची चर्चा राष्ट्रवादीत झाली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळावा ७ नोव्हेंबरला शहरातील चंद्रपूर रोडवरील एका लॉन्समध्ये झाला. यानंतर सुनील तटकरे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या सदस्या आबा पांडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर उपस्थित होते.

यावेळी तटकरे म्हणाले, भाजपसोबत युतीच्या चर्चा २००९, २०१४, २०१९ मध्येही झाल्या, पण त्यावर निर्णय का होऊ शकला नाही. राजकारणात तडजोडी कराव्या लागतात, त्याचाच एक भाग म्हणून सर्वांच्या संमतीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बेरोजगार, शेतकरी , महिलांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यास ठिकठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. कालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर यश मिळवले आहे. यामुळे जनमत अजित पवार यांच्यासोबतच आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असा दावा त्यांनी केला. लोकसभेला राज्यात महायुती ४५ पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करुन आगामी विधानसभा निवडणूकही एकत्रितच लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध

सकल मराठा समाजाने राज्यात यापूर्वी आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढले. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार वचनबध्द असल्याचे सुनील तटकरे म्हणाले. विशेष म्हणजे कालमर्यादेत व टिकणारे आरक्षण द्यायचे असून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे याकरता प्रयत्नशील आहेत, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरेGadchiroliगडचिरोलीBJPभाजपा