शाळा तर सुरू झाल्या, बसेसचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:52+5:302021-02-05T08:50:52+5:30
आष्टी येथे राजे धर्मराव हायस्कूल व महात्मा जाेतिबा फुले हायस्कूलमध्ये आष्टी परिसरातील ३००ते ४००विद्यार्थी ये-जा करतात. मात्र बसेस अभावी ...

शाळा तर सुरू झाल्या, बसेसचे काय?
आष्टी येथे राजे धर्मराव हायस्कूल व महात्मा जाेतिबा फुले हायस्कूलमध्ये आष्टी परिसरातील ३००ते ४००विद्यार्थी ये-जा करतात. मात्र बसेस अभावी विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळेत कमी दिसत आहे.
बाॅक्स .
चपराळा बस दहा महिन्यांपासून बंद
अहेरी आगाराची अहेरी-चपराळा बसही लाॅकडाऊनमुळे बंद झाली. तेव्हापासून सुरूच झालेली नाही. त्यामुळे इल्लूर, ठाकरी, कुनघाडा, चपराळा, चाैडमपल्ली, सिंगनपल्ली या गावातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना आष्टी येथे येण्यास फार अडचण निर्माण झालेली आहे. तेव्हा चपराळा बस सुरू करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केलेली आहे.
बाॅक्स ....
२०० रुपयांच्या पासकरिता १०० रुपये प्रवास खर्च
वाहतूक नियंत्रकाला सहा महिन्यांपासून अहेरी येथे डेपाेमध्ये बाेलाविल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मासिक, त्रैमासिक पासेस काढण्यास अडचण निर्माण हाेत आहे. २०० रुपयांची मासिक पास काढण्यासाठी १०० रुपये खर्च करून अहेरीला जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बसेच विद्यार्थी गाेंडपिपरी, चामाेर्शीला जाणे-येणे करतात.